Maharashtra Rain : पावसाचे थैमान! राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला असून महाराष्ट्रात पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढला आहे. पहाटेपासून हजेरी लावलेल्या पावसाने ठिकठिकाणी थैमान घातले आहे. पहिल्याच पावसामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली असली तरीही नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान विभागाकडून (IMD) पुढील काही दिवस मुंबईकरांचा दिलासा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पहाटे ४ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. अशातच हवामान विभागाने राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिला असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे.



या भागांत पावसाची शक्यता


कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानकडून वर्तवण्यात आली आहे.



'या' जिल्ह्यात पावसाचा अलर्ट


भारतीय हवामान खात्याने सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. अंदाजनुसार ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहत पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबत हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

कोकणवासीयांचा 'शिमगा' गोड

मुंबई-विजयदुर्ग जलप्रवासाचा १ मार्चपासून श्रीगणेशा; मंत्री नितेश राणे यांचे स्वप्न साकार मुंबई : कोकणच्या लाल

Kumbhdoot App : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले 'कुंभदूत ॲप'चे अनावरण

- एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये

सैनिक शाळेत शिकण्याची सुवर्णसंधी

पुणे : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता

नोकरी लावून देतो सांगत २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार; शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर शहरात शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध

चक्क व्हॉट्सअ‍ॅप वरून बारावीचा पेपर मुलांपर्यंत पोहोचला? नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत

भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात