Maharashtra Rain : पावसाचे थैमान! राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला असून महाराष्ट्रात पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढला आहे. पहाटेपासून हजेरी लावलेल्या पावसाने ठिकठिकाणी थैमान घातले आहे. पहिल्याच पावसामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली असली तरीही नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान विभागाकडून (IMD) पुढील काही दिवस मुंबईकरांचा दिलासा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पहाटे ४ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. अशातच हवामान विभागाने राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिला असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे.



या भागांत पावसाची शक्यता


कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानकडून वर्तवण्यात आली आहे.



'या' जिल्ह्यात पावसाचा अलर्ट


भारतीय हवामान खात्याने सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. अंदाजनुसार ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहत पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबत हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक