Maharashtra Rain : पावसाचे थैमान! राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला असून महाराष्ट्रात पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढला आहे. पहाटेपासून हजेरी लावलेल्या पावसाने ठिकठिकाणी थैमान घातले आहे. पहिल्याच पावसामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली असली तरीही नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान विभागाकडून (IMD) पुढील काही दिवस मुंबईकरांचा दिलासा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पहाटे ४ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. अशातच हवामान विभागाने राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिला असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे.



या भागांत पावसाची शक्यता


कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानकडून वर्तवण्यात आली आहे.



'या' जिल्ह्यात पावसाचा अलर्ट


भारतीय हवामान खात्याने सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. अंदाजनुसार ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहत पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबत हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

Govind Barge case: सोन्याचे दागिने, प्लॉट, बुलेट ते शेतजमीन... तरी तिची भूक भागली नाही, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!

बीड: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची

पीएमपीएमएलची पानशेत पर्यटन बससेवा

जंगल सफारीचे विशेष आकर्षण पुणे : पीएमपीएमएलने पुणेकरांच्या आग्रहास्तव पानशेत पर्यटन बससेवा सुरू केली आहे. ही

‘महादेवी’च्या अनुपस्थितीतच नांदणी मठात नवरात्रोत्सव साजरा होणार ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय

हिंदी कवी कुमार अंबुज यांना यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय

MSRTC ST jobs recruitment : राज्यातील युवांसाठी सुवर्णसंधी! एसटीमध्ये मेगाभरती धमाका, १७,४५० चालक-सहायक पदे तर तब्बल 'इतका' पगार

मुंबई : भविष्यात राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत सुमारे ८,००० नवीन बसेस सुरू करण्याच्या योजना असल्याने

Navratri 2025 : नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठीचं, मुस्लिमांना 'नो एंट्री' ,विश्व हिंदू परिषदेची कठोर सूचना

नागपुर : देशभरात उत्साहाने सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातून एक मोठी अपडेट समोर