Phone Hack : सावधान! 'या' युजर्सचा कधीही होईल फोन हॅक

  58

सरकारने दिली धोक्याची घंटा


मुंबई : अ‍ॅण्ड्रॉइड (Android) फोन वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अलीकडेच एक इशारा दिला आहे. स्मार्टफोन हॅकिंग आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अशातच अॅण्ड्रॉइड फोन युजर्ससाठी सरकारने दिली धोक्याची घंटा दिली आहे.


CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, Android OS मध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींमुळे, जर कोणत्याही हॅकरला तुमचा फोन हॅक (Phone Hack) करायचा असल्यास त्याच्यासाठी ते खूप सोपे होणार आहे. त्रुटींचा वापर करून हॅकर्स तुमच्या फोनमधून तुमची महत्त्वाची माहिती आणि डेटा काढू शकतात. या प्रकरणामध्ये Android 12, Android 12L, Android 13 आणि Android 14 चा समावेश आहे. त्यामुळे CERT-In ने युजर्सना लवकरात लवकर सिक्युरिटी पॅच अपडेट करण्यास सांगितले आहे.



असा करा तुमचा फोन अपडेट



  • सर्वात आधी तुमच्या फोनची Setting ओपन करा.

  • त्यात सॉफ्टवेअर अपडेट्स शोधा आणि ते उघडा.

  • यानंतर Check for Updates वर क्लिक करा.

  • जर 'Update available' म्हणजे अपडेट उपलब्ध असेल तर ते डाउनलोड करा.

  • अपडेट डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करा.

  • इन्स्टॉल केल्यानंतर फोन रीस्टार्ट करा.

  • यानंतर तुमचा फोन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या