Nandurbar News : चांदसैली घाटात पुन्हा दरड कोसळली; प्रवाशांचा जीव टांगणीला

  97

दोन तासांपासून वाहतूक सेवा विस्कळीत


नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील चांदसैली घाट (Chandsaili Ghat) हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक परंतु प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याच्या (Land collapsed) घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे वाहतुकीची (Transportation) समस्या निर्माण होत असते. अशीच घटना पुन्हा चांदसैली घाटात घडली आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या दुर्घटनेनंतर काही तासांपासून घाटातील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक सुरू असतानाच ही दरड कोसळली, मात्र सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. या दुर्घटनेनंतर दोन तासांपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली असून ही दरड आता कधी बाजूला होणार? आणि रस्ता कधी सुरू होणार? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही. सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्या तरीही आमदार के.सी. पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनी याबाबत कधीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.



बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


चांदसैली घाटातील रस्ता तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा दरड प्रवण भाग असून या घाटात नेहमी दरड कोसळत असतात. परंतु बांधकाम विभागाकडून याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यावर्षीही या भागात पहिल्याच पावसात दरडी कोसळल्याच्या घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Comments
Add Comment

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन