Nandurbar News : चांदसैली घाटात पुन्हा दरड कोसळली; प्रवाशांचा जीव टांगणीला

दोन तासांपासून वाहतूक सेवा विस्कळीत


नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील चांदसैली घाट (Chandsaili Ghat) हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक परंतु प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याच्या (Land collapsed) घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे वाहतुकीची (Transportation) समस्या निर्माण होत असते. अशीच घटना पुन्हा चांदसैली घाटात घडली आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या दुर्घटनेनंतर काही तासांपासून घाटातील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक सुरू असतानाच ही दरड कोसळली, मात्र सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. या दुर्घटनेनंतर दोन तासांपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली असून ही दरड आता कधी बाजूला होणार? आणि रस्ता कधी सुरू होणार? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही. सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्या तरीही आमदार के.सी. पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनी याबाबत कधीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.



बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


चांदसैली घाटातील रस्ता तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा दरड प्रवण भाग असून या घाटात नेहमी दरड कोसळत असतात. परंतु बांधकाम विभागाकडून याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यावर्षीही या भागात पहिल्याच पावसात दरडी कोसळल्याच्या घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा