Nandurbar News : चांदसैली घाटात पुन्हा दरड कोसळली; प्रवाशांचा जीव टांगणीला

  113

दोन तासांपासून वाहतूक सेवा विस्कळीत


नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील चांदसैली घाट (Chandsaili Ghat) हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक परंतु प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याच्या (Land collapsed) घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे वाहतुकीची (Transportation) समस्या निर्माण होत असते. अशीच घटना पुन्हा चांदसैली घाटात घडली आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या दुर्घटनेनंतर काही तासांपासून घाटातील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक सुरू असतानाच ही दरड कोसळली, मात्र सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. या दुर्घटनेनंतर दोन तासांपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली असून ही दरड आता कधी बाजूला होणार? आणि रस्ता कधी सुरू होणार? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही. सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्या तरीही आमदार के.सी. पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनी याबाबत कधीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.



बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


चांदसैली घाटातील रस्ता तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा दरड प्रवण भाग असून या घाटात नेहमी दरड कोसळत असतात. परंतु बांधकाम विभागाकडून याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यावर्षीही या भागात पहिल्याच पावसात दरडी कोसळल्याच्या घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या