Manoj Jarange Patil : परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम!

आजपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. ज्या गावातून मराठा आंदोलनाचा वणवा राज्यभरात पेटला त्या अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावातच जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, याला जुमानता जरांगे उपोषणावर ठाम आहेत, त्यामुळे अंतरवाली सराटीत पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे.


देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या धामधुमीतच ४ जून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार होते. मात्र, आचारसंहिता असल्यामुळे जरांगेना परवानगी देण्यात आली नाही. यानंतर जरांगेनी आजपासून उपोषण करायचे ठरवले. या उपोषणाला पोलिसांसह अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीही विरोध केला होता. गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले होते. ग्रामपंचायतीच्या कामांना अडथळा आणि महिला व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास, तसेच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेची कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीही जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे.


सगेसोयरेबाबत सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे उपोषण असणार आहे. सरकार आपल्याला फसवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मात्र, यावेळेस त्यांच्या उपोषणाला मराठा समाजाकडूनही थंड प्रतिसाद मिळत आहे. असं असलं तरी अंतरवाली सराटीमध्ये या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने टीन पत्र्याचा शेड तयार करण्यात आला आहे. पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा वाढविण्यात आली आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलीय.



पोलिसांचा मोठा बंदोबस्त


अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक डीवायएसपी, चार पीआय, १४ पीएसआय, एपीआयसह २७५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यात १२० एसआरपीएफचे जवान, २४ दंगा नियंत्रण पथकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.

संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान; आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका

बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण

Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील

Navnath Ban: नगरसेवक नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती

मुंबई: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा या छोट्याशा गावातून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपर्यंतचा

Pune: पुण्यातील 'या' वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

पुणे: पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आलं असून २४