Surendra Agarwal : धनिकपुत्राच्या आजोबाच्या अडचणीत वाढ! अनधिकृत MPG क्लबवर बुलडोझर

  99

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते कारवाईचे आदेश


सातारा : पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेमुळे (Pune Porsche Car Accident) अख्ख्या राज्याचं वातावरण तापलं होतं. या मुलाला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कशी कामाला लागली होती, याची उदाहरणे वारंवार समोर येत होती. या प्रकरणात त्याचे आईवडील व आजोबाही तितकेच दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली. मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांच्याबाबत तर सातत्याने त्यांचा काळा कारभार समोर येत आहे.


सुरेंद्र अगरवालचा महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आल्यानंतर आता एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनियमितता आढळल्यास बुलडोझर चालवण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी दिले होते. यानंतर आता सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.


सुरेंद्र अगरवालच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारचा परवाना रद्द करत बार सील केला होता. अग्रवाल कुटुंबियांच्या मालकीचे महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनियमितता असेल तर त्या हॉटेलवर बुलडोझर चालवावा असा थेट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. यानंतर आठ दिवसांच्या आत ही कारवाई करण्यात आली आहे.



सुरेंद्र अग्रवालवर आणखी कोणते आरोप?


चालकाला डांबून ठेवणे, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा सुरेंद्र अग्रवालने नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. गाडी तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारीला धमकावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सुरेंद्र अग्रवालने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप सुद्धा आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक