Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! बस आणि ट्रकची जोरदार धडक

एकाचा मृत्यू, ७ जण जखमी


नाशिक : राज्यभरात अपघाताच्या (Accident News) सत्रात सातत्याने वाढ होत असताना नाशिकमधूनही (Nashik) एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल बस व ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला तालुक्यातील देशमाने गावाजवळ हा भीषण अपघात झाला. जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत होते. दर्शनावरुन परत येताना देशमाने गावाजवळ हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक आणि बस समोरासमोर धडक देऊन रस्त्याच्या कडेला शेतात घुसली. या दुर्घटनेत बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमी झालेल्या रुग्णांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,