Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! बस आणि ट्रकची जोरदार धडक

एकाचा मृत्यू, ७ जण जखमी


नाशिक : राज्यभरात अपघाताच्या (Accident News) सत्रात सातत्याने वाढ होत असताना नाशिकमधूनही (Nashik) एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल बस व ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला तालुक्यातील देशमाने गावाजवळ हा भीषण अपघात झाला. जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत होते. दर्शनावरुन परत येताना देशमाने गावाजवळ हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक आणि बस समोरासमोर धडक देऊन रस्त्याच्या कडेला शेतात घुसली. या दुर्घटनेत बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमी झालेल्या रुग्णांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात