Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांचा नकार!

काय आहे कारण?


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या धामधुमीतच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार होते. येत्या शनिवारपासून ते आमरण उपोषण करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगेंना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारण्यामागची काही कारणेही समोर आली आहेत.


ज्या गावातून मराठा आंदोलनाचा वणवा राज्यभरात पेटला त्या अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच काही दिवसांपूर्वी जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला होता. तसे निवेदनच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले होते. या निवेदनात ‘गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये’, अशी मागणी केली होती. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला. निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या असल्याने जरांगे यांचं उपोषण वादात सापडलं. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं हे एक कारण आहे.


यासोबतच ग्रामपंचायतीच्या कामांना अडथळा आणि महिला व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेची कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: