Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांचा नकार!

काय आहे कारण?


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या धामधुमीतच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार होते. येत्या शनिवारपासून ते आमरण उपोषण करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगेंना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारण्यामागची काही कारणेही समोर आली आहेत.


ज्या गावातून मराठा आंदोलनाचा वणवा राज्यभरात पेटला त्या अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच काही दिवसांपूर्वी जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला होता. तसे निवेदनच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले होते. या निवेदनात ‘गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये’, अशी मागणी केली होती. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला. निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या असल्याने जरांगे यांचं उपोषण वादात सापडलं. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं हे एक कारण आहे.


यासोबतच ग्रामपंचायतीच्या कामांना अडथळा आणि महिला व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेची कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास