Nilesh Rane : राणे कधीही माफ करत नसतात!

निलेश राणे यांचा सामंत बंधूंना इशारा; काय आहे प्रकरण?


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार (Loksabha Election results) महायुतीला (Mahayuti) राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला समजले जाणारे कोकण भाजपाने आपल्या ताब्यात घेतले. या ठिकाणी नारायण राणे (Narayan Rane) यांचा ४८ हजार मतांच्या आघाडीने दणदणीत विजय झाला. मात्र, ही लढाई सोपी नव्हती. या प्रवासात महायुतीतच काही मतभेद झाल्याचेही समोर आले. यानंतर आता नारायण राणे यांचे सुपुत्र व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. निलेश राणे यांनी सामंत बंधूंवर जोरदार टीका केली आहे. तसेच राणे कधीही माफ करत नसतात असा इशाराही त्यांनी दिला आहे.


उदय सामंत (Uday Samant) यांच्या मतदारसंघात नारायण राणे पिछाडीवर गेल्याने निलेश राणे यांनी सामंत बंधूंवर आरोप केले आहेत. निलेश राणे म्हणाले, उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. पालकमंत्री असून देखील ते आम्हाला लीड देऊ शकले नाहीत. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत.


उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत. सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही. विजयी मिरवणुकीतही उदय सामंत दिसले नाहीत. ते का आले नाहीत हे त्यांनाच विचारा असं निलेश राणे म्हणाले.



निलेश राणे यांचा खळबळजनक दावा


निवडणुकीच्या काळात किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा निलेश राणे यांनी केला. त्याचे आपल्याकडे पुरावे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याची माहिती देणार असल्याचं निलेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना