Nilesh Rane : राणे कधीही माफ करत नसतात!

निलेश राणे यांचा सामंत बंधूंना इशारा; काय आहे प्रकरण?


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार (Loksabha Election results) महायुतीला (Mahayuti) राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला समजले जाणारे कोकण भाजपाने आपल्या ताब्यात घेतले. या ठिकाणी नारायण राणे (Narayan Rane) यांचा ४८ हजार मतांच्या आघाडीने दणदणीत विजय झाला. मात्र, ही लढाई सोपी नव्हती. या प्रवासात महायुतीतच काही मतभेद झाल्याचेही समोर आले. यानंतर आता नारायण राणे यांचे सुपुत्र व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. निलेश राणे यांनी सामंत बंधूंवर जोरदार टीका केली आहे. तसेच राणे कधीही माफ करत नसतात असा इशाराही त्यांनी दिला आहे.


उदय सामंत (Uday Samant) यांच्या मतदारसंघात नारायण राणे पिछाडीवर गेल्याने निलेश राणे यांनी सामंत बंधूंवर आरोप केले आहेत. निलेश राणे म्हणाले, उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. पालकमंत्री असून देखील ते आम्हाला लीड देऊ शकले नाहीत. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत.


उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत. सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही. विजयी मिरवणुकीतही उदय सामंत दिसले नाहीत. ते का आले नाहीत हे त्यांनाच विचारा असं निलेश राणे म्हणाले.



निलेश राणे यांचा खळबळजनक दावा


निवडणुकीच्या काळात किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा निलेश राणे यांनी केला. त्याचे आपल्याकडे पुरावे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याची माहिती देणार असल्याचं निलेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची