Stock Market: मंगळवारी आला होता भूकंप...आज दिसतेय चांगली स्थिती, उघडताच सेन्सेक्सने घेतली ६०० अंकांची उसळी

  58

मुंबई: शेअर बाजारात(share market) मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान मोठा भूकंप आला होता. यातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्स ६००० अंकांहून अधिक अंकांनी बुडाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये तब्बल १९०० अंकांपर्यंत घसरला होता.


दरम्यान, मार्केट बंद होत होता साधारण २०० अंकांची रिकव्हरी पाहायला मिळाली होता. आज बाजार वाढीसोबतच सुरू झाला आणि सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्सनी हिरव्या निशाणावर कारभार सुरू केला. सकाळी ९.१५ वाजता मार्केट सुरू होताना सेन्सेक्स ६७२.८४ अंक म्हणजेच ०.९३ टक्क्यांच्या उसळीसह ७२,७५१ अंकाच्या स्तरावर सुरू झाला.



मंगळवारी आला होता भूकंप


याआधी मंगळवारच्या कारभाराची बात केली असता. मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ३० शेयरचा सेन्सेक्स १७०० अंकांनी तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ४०० अंकांच्या घसरणीसह सुरू झाला होता. जसजसे निकाल येण्यास सुरूवात झाली तसतसा बाजार विखुरत गेला. दुपारी १२ वाजेपपर्यंतच्या जवळपास सेन्सेक्स ६०९४ अंकांपर्यंत कोसळला होता तर निफ्टीही १९०० अंकांपर्यंत घसरली होती.


दरम्यान मार्केट बंद होईपर्यंत यात रिकव्हरी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये ४३८९.७३ अंकांनी पडून ७२,०७९.०५ अंकांवर बंद झाला तर निफ्टीमध्ये १३७९.४० अंकांनी तुटून २१,८८४.५०च्या स्तरावर बंद झाला होता. शेअर बाजारात आलेल्या या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचे ३१ लाख कोटी डुबले.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )