Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन! मेघगर्जनेसह कोसळणार पावसाच्या सरी

'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा हायअलर्ट


मुंबई : काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने (Heat Wave) हैराण झालेल्या नागरिकांची मान्सून (Monsoon) प्रतिक्षा आता संपणार आहे. आज पहाटे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उन्हाची काहीली कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर आज बहुतांश राज्यात मुसळधार पावसाची हजेरी असल्याचे सांगत हवामान विभागाने (IMD) हायअलर्ट जारी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मान्सून असल्याचा हवामान विभागाने दावा केला आहे. पावसासह आज राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना हायअलर्ट दिला आहे.



'या' भागात पावसाचा यलो अलर्ट


मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.



तापमानात कमालीची घसरण


मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. तर जळगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून