Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन! मेघगर्जनेसह कोसळणार पावसाच्या सरी

  84

'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा हायअलर्ट


मुंबई : काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने (Heat Wave) हैराण झालेल्या नागरिकांची मान्सून (Monsoon) प्रतिक्षा आता संपणार आहे. आज पहाटे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उन्हाची काहीली कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर आज बहुतांश राज्यात मुसळधार पावसाची हजेरी असल्याचे सांगत हवामान विभागाने (IMD) हायअलर्ट जारी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मान्सून असल्याचा हवामान विभागाने दावा केला आहे. पावसासह आज राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना हायअलर्ट दिला आहे.



'या' भागात पावसाचा यलो अलर्ट


मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.



तापमानात कमालीची घसरण


मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. तर जळगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ