Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन! मेघगर्जनेसह कोसळणार पावसाच्या सरी

  78

'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा हायअलर्ट


मुंबई : काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने (Heat Wave) हैराण झालेल्या नागरिकांची मान्सून (Monsoon) प्रतिक्षा आता संपणार आहे. आज पहाटे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उन्हाची काहीली कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर आज बहुतांश राज्यात मुसळधार पावसाची हजेरी असल्याचे सांगत हवामान विभागाने (IMD) हायअलर्ट जारी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मान्सून असल्याचा हवामान विभागाने दावा केला आहे. पावसासह आज राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना हायअलर्ट दिला आहे.



'या' भागात पावसाचा यलो अलर्ट


मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.



तापमानात कमालीची घसरण


मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. तर जळगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या