मोदींनी पंतप्रधान पदाचा दिला राजीनामा, म्हणाले- 'विजय-पराभव हा राजकारणाचा भाग'

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच त्यांना कार्यवाहक पंतप्रधान बनण्याचा सल्ला दिला आहे.


पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत यात ते राजीनामा सोपवताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील एनडीएच्या होणाऱ्या बैठकआधी राष्ट्रपती मुर्मूंना राजीनामा सोपवला आहे.


राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिपरिषदेसोबत आपला राजीनामा सादर केला आहे. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे.


 


भाजपला बहुमत न मिळाल्याने बिघडली गोष्ट


खरंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला २९४ जागांसह बहुमत मिळाले आहे. अशातच एनडीए सरकार बनवण्याची अधिक शक्यता आहे. भाजपला आपल्या बळावर बहुमत मिळवता आलेले नाही. याच कारणामुळे राजकारणात चर्चा रंगली आहे की एनडीएचे सहकाही पक्ष त्यांना सोडणार नाहीत.


जर अशी स्थिती बनली तर एनडीएसाठी पुन्हा सत्तेत येणे कठीण आहे. सर्वाधिक चर्चा होत आहे ती बिहारचे मु्ख्यमंत्री आणि जदयू प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंबाबत चर्चा होत आहे.

Comments
Add Comment

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत