मोदींनी पंतप्रधान पदाचा दिला राजीनामा, म्हणाले- ‘विजय-पराभव हा राजकारणाचा भाग’

Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच त्यांना कार्यवाहक पंतप्रधान बनण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत यात ते राजीनामा सोपवताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील एनडीएच्या होणाऱ्या बैठकआधी राष्ट्रपती मुर्मूंना राजीनामा सोपवला आहे.

राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिपरिषदेसोबत आपला राजीनामा सादर केला आहे. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे.

 

भाजपला बहुमत न मिळाल्याने बिघडली गोष्ट

खरंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला २९४ जागांसह बहुमत मिळाले आहे. अशातच एनडीए सरकार बनवण्याची अधिक शक्यता आहे. भाजपला आपल्या बळावर बहुमत मिळवता आलेले नाही. याच कारणामुळे राजकारणात चर्चा रंगली आहे की एनडीएचे सहकाही पक्ष त्यांना सोडणार नाहीत.

जर अशी स्थिती बनली तर एनडीएसाठी पुन्हा सत्तेत येणे कठीण आहे. सर्वाधिक चर्चा होत आहे ती बिहारचे मु्ख्यमंत्री आणि जदयू प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंबाबत चर्चा होत आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

10 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

11 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

11 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

12 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

13 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

13 hours ago