Lok Saha Election Result 2024: २४० जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष, शतकापासून मागे राहिली काँग्रेस

  103

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४चे(loksabha election 2024) निकाल लागले आहेत. मंगळवारी ४ जूनला सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया बुधवारपर्यंत सुरू होती. सर्व ५४३ जागांवरील निकाल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २४० जागांवर विजय मिळवला आहे तर ९९ जागांवरील विजयासह काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे.


इतर मोठ्या पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास इंडिया आघाडीमध्ये सामील आणि उत्तर प्रदेशात भाजपचे सर्वात मोठे नुकसान करणाऱ्या समाजवादी पक्षाला यावेळेस ३७ जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षानंतर ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेसने २९ जागांवर विजय मिळवला आहे.



टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जदयूला चांगले यश


द्रविड मुन्नेत्र कडगम ने या लोकसभा निवडणुकीत २२ जागांवर यश मिळवले. तेलुगु देसम पार्टीने १६ जागा मिळवण्यात यश मिळवले. यानंतर नंबर येतो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाचा. जेडीयूने या निवडणुकीत १२ जागांवर यश मिळवले.



उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दाखवली ताकद


राज्यात उद्धव ठाकरेंना मोठे यश मिळाले. त्यांचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत ९ जागा मिळाल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा, शिंदे गटाला ७ जागा मिळाल्या. बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाला ५ जागांवर यश मिळाले.


आंध्र प्रदेशातील सत्तेत सहभागी वायएसआरसीपीला यावेळेस मोठे नुकसान झाले. एकीकडे राज्यातील सत्ता त्यांच्या हातून गेली दुसरीकडे त्यांना केवळ ४ जागांवर यश मिळाले. बिहारमध्ये आरजेडीला ४ जागांवर यश मिळवता आले.


Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )