Lok Saha Election Result 2024: २४० जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष, शतकापासून मागे राहिली काँग्रेस

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४चे(loksabha election 2024) निकाल लागले आहेत. मंगळवारी ४ जूनला सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया बुधवारपर्यंत सुरू होती. सर्व ५४३ जागांवरील निकाल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २४० जागांवर विजय मिळवला आहे तर ९९ जागांवरील विजयासह काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे.


इतर मोठ्या पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास इंडिया आघाडीमध्ये सामील आणि उत्तर प्रदेशात भाजपचे सर्वात मोठे नुकसान करणाऱ्या समाजवादी पक्षाला यावेळेस ३७ जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षानंतर ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेसने २९ जागांवर विजय मिळवला आहे.



टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जदयूला चांगले यश


द्रविड मुन्नेत्र कडगम ने या लोकसभा निवडणुकीत २२ जागांवर यश मिळवले. तेलुगु देसम पार्टीने १६ जागा मिळवण्यात यश मिळवले. यानंतर नंबर येतो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाचा. जेडीयूने या निवडणुकीत १२ जागांवर यश मिळवले.



उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दाखवली ताकद


राज्यात उद्धव ठाकरेंना मोठे यश मिळाले. त्यांचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत ९ जागा मिळाल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा, शिंदे गटाला ७ जागा मिळाल्या. बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाला ५ जागांवर यश मिळाले.


आंध्र प्रदेशातील सत्तेत सहभागी वायएसआरसीपीला यावेळेस मोठे नुकसान झाले. एकीकडे राज्यातील सत्ता त्यांच्या हातून गेली दुसरीकडे त्यांना केवळ ४ जागांवर यश मिळाले. बिहारमध्ये आरजेडीला ४ जागांवर यश मिळवता आले.


Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०