Lok Saha Election Result 2024: २४० जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष, शतकापासून मागे राहिली काँग्रेस

Share

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४चे(loksabha election 2024) निकाल लागले आहेत. मंगळवारी ४ जूनला सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया बुधवारपर्यंत सुरू होती. सर्व ५४३ जागांवरील निकाल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २४० जागांवर विजय मिळवला आहे तर ९९ जागांवरील विजयासह काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे.

इतर मोठ्या पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास इंडिया आघाडीमध्ये सामील आणि उत्तर प्रदेशात भाजपचे सर्वात मोठे नुकसान करणाऱ्या समाजवादी पक्षाला यावेळेस ३७ जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षानंतर ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेसने २९ जागांवर विजय मिळवला आहे.

टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जदयूला चांगले यश

द्रविड मुन्नेत्र कडगम ने या लोकसभा निवडणुकीत २२ जागांवर यश मिळवले. तेलुगु देसम पार्टीने १६ जागा मिळवण्यात यश मिळवले. यानंतर नंबर येतो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाचा. जेडीयूने या निवडणुकीत १२ जागांवर यश मिळवले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दाखवली ताकद

राज्यात उद्धव ठाकरेंना मोठे यश मिळाले. त्यांचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत ९ जागा मिळाल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा, शिंदे गटाला ७ जागा मिळाल्या. बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाला ५ जागांवर यश मिळाले.

आंध्र प्रदेशातील सत्तेत सहभागी वायएसआरसीपीला यावेळेस मोठे नुकसान झाले. एकीकडे राज्यातील सत्ता त्यांच्या हातून गेली दुसरीकडे त्यांना केवळ ४ जागांवर यश मिळाले. बिहारमध्ये आरजेडीला ४ जागांवर यश मिळवता आले.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

3 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

5 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago