Sharad Pawar : भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी बारामतीचा पैलवान दिल्लीला जाणार

Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) कल आता स्पष्ट झाले असून देशात भाजपा प्रणित एनडीए सरकार येणार (३०० जागा) हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मात्र इंडिया आघाडीच्या (India Alliance) २२९ जागा येण्याची शक्यता आहे. अर्थात एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणारच आहे. मात्र, भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी पाडापाडीच्या राजकारणात मुरलेल्या शरद पवारांनी हालचाली वाढवल्या आहेत. दस्तुरखूद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनीच माध्यमांशी संवाद साधला याबाबत सुतोवाच केले. यावेळी बोलतांना त्यांनी आतापर्यंतचा कल हा परिवर्तनाला पोषक असून देशातील जनतेने धर्मांध आणि जातीपातीचे राजकारण नाकारले आहे. तसेच, आम्ही २५० जागांच्याही पुढे जाऊ, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, मी नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांना फोन केलेला नाही. मी आज फक्त इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सिताराम येचुरींसह अन्य लोकांशी चर्चा केली. उद्या आमची बैठक होण्याची शक्यता आहे. आम्ही एकत्रित राहू. उद्याच्या दिल्लीला होणा-या बैठकीत आम्ही पुढील धोरणं ठरवू, असेही पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचा आतापर्यंतच कल परिवर्तनाला पोषक आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही दहा जागा लढल्या. मात्र, सात जागांवर आम्ही आघाडीवर आहोत. हे आमच्या एकट्याचे य़श नाही, तर हे महाविकास आघाडीचे यश आहे. आमच्यासोबत आमच्या मित्रपक्षांनीही यश मिळवले आहे. हे सगळं यश काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि आमच्या कार्यकर्त्याचे आहे, असे पवार म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये फारच वेगळा निकाल लागला आहे. या निकालाचे एक वैशिष्ट असे की, यापूर्वी भाजपला युपीमध्ये जे यश मिळायचे, त्याची मार्जिन फार असायची. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला फारच मर्यादित जागा मिळत असल्याचे पवार म्हणाले.

Tags: Sharad Pawar

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

2 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

3 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

4 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

4 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

5 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

5 hours ago