Sharad Pawar : भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी बारामतीचा पैलवान दिल्लीला जाणार

  155

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) कल आता स्पष्ट झाले असून देशात भाजपा प्रणित एनडीए सरकार येणार (३०० जागा) हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मात्र इंडिया आघाडीच्या (India Alliance) २२९ जागा येण्याची शक्यता आहे. अर्थात एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणारच आहे. मात्र, भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी पाडापाडीच्या राजकारणात मुरलेल्या शरद पवारांनी हालचाली वाढवल्या आहेत. दस्तुरखूद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनीच माध्यमांशी संवाद साधला याबाबत सुतोवाच केले. यावेळी बोलतांना त्यांनी आतापर्यंतचा कल हा परिवर्तनाला पोषक असून देशातील जनतेने धर्मांध आणि जातीपातीचे राजकारण नाकारले आहे. तसेच, आम्ही २५० जागांच्याही पुढे जाऊ, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे.


ते म्हणाले की, मी नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांना फोन केलेला नाही. मी आज फक्त इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सिताराम येचुरींसह अन्य लोकांशी चर्चा केली. उद्या आमची बैठक होण्याची शक्यता आहे. आम्ही एकत्रित राहू. उद्याच्या दिल्लीला होणा-या बैठकीत आम्ही पुढील धोरणं ठरवू, असेही पवार म्हणाले.


शरद पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचा आतापर्यंतच कल परिवर्तनाला पोषक आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही दहा जागा लढल्या. मात्र, सात जागांवर आम्ही आघाडीवर आहोत. हे आमच्या एकट्याचे य़श नाही, तर हे महाविकास आघाडीचे यश आहे. आमच्यासोबत आमच्या मित्रपक्षांनीही यश मिळवले आहे. हे सगळं यश काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि आमच्या कार्यकर्त्याचे आहे, असे पवार म्हणाले.


उत्तर प्रदेशमध्ये फारच वेगळा निकाल लागला आहे. या निकालाचे एक वैशिष्ट असे की, यापूर्वी भाजपला युपीमध्ये जे यश मिळायचे, त्याची मार्जिन फार असायची. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला फारच मर्यादित जागा मिळत असल्याचे पवार म्हणाले.

Comments
Add Comment

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार