LS Election 2024 : केंद्र सरकारसाठी आज जनादेश

देशाचा कारभारी ठरणार, लोकसभा निवडणुकीची आज मतमोजण


मुंबई : जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र गणल्या जाणाऱ्या भारताच्या लोकसभा निवडणुकीची मंगळवारी (दि. ४ जुन) मतमोजणी होणार असून केंद्रीय निवडणुक आयोगाने त्या त्या राज्यातील निवडणुक आयोगाच्या माध्यमातून व स्थानिक पोलिसांच्या सहकार्यांने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. गुजरातमधील एका मतदारसंघात बिनविरोध निवडणूक झाल्याने उर्वरित ५४२ मतदारसंघासाठी सात टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीची मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीनंतर देशाचा कारभार कोण चालविणार, याचे उत्तर मिळणार आहे.


देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया झाली. १९ एप्रिल रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा झाला. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या पाच टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात मतदान झाले. त्यानंतर सहावा टप्पा २५ मे रोजी तर शेवटचा टप्पा १ जून रोजी झाला. देशात इंडिया आघाडी आणि एनडीए यामध्येच प्रमुख लढत होती. एनडीएचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर इंडिया आघाडीची बाजू राहुल गांधी यांनी सांभाळली. चार जून रोजी लोकसभा निवडणुकांसोबत आंध्र प्रदेश आणि ओडिसा विधानसभेची मतमोजणी होणार आहे.


देशातील सर्वच एग्झिटपोलनुसार पुन्हा एनडीएकडे सत्तेची सूत्र जात आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहून देशात भाजप विरोधी वातावरण झालेले नाही. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. सर्वच संस्थांनी ३५० पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला १२५ ते १५० पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालापूर्वी आणि एक्झिट पोलनंतर दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.


महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातही मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे. राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण १४५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.


मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.


प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) व राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) व नवाब दीन (एस.सी.एस.) यांची नियुक्ती केली आहे.


सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून भाजपाच सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारी अरुणाचलमध्ये विधानसभा मतमोजणीत भाजपाला दणदणीत यश मिळाल्याने भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी उत्साही असल्याचे देशाच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळत आहे.

Comments
Add Comment

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत