Loksabha election 2024: रायबरेलीतून राहुल गांधींचा मोठा विजय, ३ लाख ९० हजार मतांनी जिंकले

रायबरेली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून तब्बल ३ लाख ९० हजार मतांनी जिंकून आले आहेत.


यंदाची निवडणूक ही राहुल गांधीच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती. यावेळचा विजय हा राहुल गांधींसाठी खास आहे. गांधी कुटुंबातील तिसरी पिढी म्हणून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते आणि संपूर्ण देशाची नजर रायबरेलीच्या निकालावर होती. तर काँग्रेसचा गड जिंकता न आल्याने भाजपच्या गोटात मात्र नाराजी आहे.


यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात देशातील इतर पक्ष एकत्र झाले होते. या निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी देशभरात यात्रा काढली होती.


दरम्यान, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. राहुल गांधीच्या रायबरेली मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह उभे होते.

Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०