रायबरेली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून तब्बल ३ लाख ९० हजार मतांनी जिंकून आले आहेत.
यंदाची निवडणूक ही राहुल गांधीच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती. यावेळचा विजय हा राहुल गांधींसाठी खास आहे. गांधी कुटुंबातील तिसरी पिढी म्हणून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते आणि संपूर्ण देशाची नजर रायबरेलीच्या निकालावर होती. तर काँग्रेसचा गड जिंकता न आल्याने भाजपच्या गोटात मात्र नाराजी आहे.
यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात देशातील इतर पक्ष एकत्र झाले होते. या निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी देशभरात यात्रा काढली होती.
दरम्यान, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. राहुल गांधीच्या रायबरेली मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह उभे होते.
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…