Loksabha election 2024: रायबरेलीतून राहुल गांधींचा मोठा विजय, ३ लाख ९० हजार मतांनी जिंकले

  87

रायबरेली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून तब्बल ३ लाख ९० हजार मतांनी जिंकून आले आहेत.


यंदाची निवडणूक ही राहुल गांधीच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती. यावेळचा विजय हा राहुल गांधींसाठी खास आहे. गांधी कुटुंबातील तिसरी पिढी म्हणून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते आणि संपूर्ण देशाची नजर रायबरेलीच्या निकालावर होती. तर काँग्रेसचा गड जिंकता न आल्याने भाजपच्या गोटात मात्र नाराजी आहे.


यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात देशातील इतर पक्ष एकत्र झाले होते. या निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी देशभरात यात्रा काढली होती.


दरम्यान, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. राहुल गांधीच्या रायबरेली मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह उभे होते.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )