मुंबईत महायुतीच्या संख्याबळात घट

  125

मुंबई : महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस याचा समावेश असणाऱ्या महायुतीच्या संख्याबळात घट झाली असून काँग्रेस, शपग राष्ट्रवादी, उबाठा गटाची शिवसेना यांचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र राज्यात मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी गणल्या जाणाऱ्या मुंबईवर मात्र महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहीले असून महायुतीला मुंबईत दणदणीत पराभव स्विकारावा लागला आहे.


मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन जागांवर उबाठा गटाची शिवसेना, एका जागेवर काँग्रेस अशा चार जागांवर महाविकास आघाडीला तर भाजपाला व शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. महायुतीकडून मुंबईत भाजपाने तीन जागा तर शिवसेनेने तीन जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या राहूल शेवाळे, आमदार यामिनी यशवंत जाधव या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना उबाठा गटाच्या शिवसेनेच्या अनिल देसाई, अरविंद सावंत यांनी पराभूत केले आहे. उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई) हा गेल्या काही निवडणुकांपासून भाजपाचा बालेकिल्ला गणला जात असून या ठिकाणी भाजपाचा उमेदवार बदलत गेला तरी या जागेवरुन भाजपाचाच उमेदवार विजयी होत होता. या मतदारसंघात उबाठा गटाच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील विजयी झाले आहेत.


उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाने पूनम महाजन यांना तिकीट नाकारत त्याजागी अॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. त्या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षां गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकिट नाकारत पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती. उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने पियुष गोयल मोठे मताधिक्य घेत विजयी झाले आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर