मुंबईत महायुतीच्या संख्याबळात घट

मुंबई : महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस याचा समावेश असणाऱ्या महायुतीच्या संख्याबळात घट झाली असून काँग्रेस, शपग राष्ट्रवादी, उबाठा गटाची शिवसेना यांचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र राज्यात मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी गणल्या जाणाऱ्या मुंबईवर मात्र महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहीले असून महायुतीला मुंबईत दणदणीत पराभव स्विकारावा लागला आहे.


मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन जागांवर उबाठा गटाची शिवसेना, एका जागेवर काँग्रेस अशा चार जागांवर महाविकास आघाडीला तर भाजपाला व शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. महायुतीकडून मुंबईत भाजपाने तीन जागा तर शिवसेनेने तीन जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या राहूल शेवाळे, आमदार यामिनी यशवंत जाधव या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना उबाठा गटाच्या शिवसेनेच्या अनिल देसाई, अरविंद सावंत यांनी पराभूत केले आहे. उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई) हा गेल्या काही निवडणुकांपासून भाजपाचा बालेकिल्ला गणला जात असून या ठिकाणी भाजपाचा उमेदवार बदलत गेला तरी या जागेवरुन भाजपाचाच उमेदवार विजयी होत होता. या मतदारसंघात उबाठा गटाच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील विजयी झाले आहेत.


उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाने पूनम महाजन यांना तिकीट नाकारत त्याजागी अॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. त्या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षां गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकिट नाकारत पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती. उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने पियुष गोयल मोठे मताधिक्य घेत विजयी झाले आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात