BSC Nursing Exam : आरोग्य विद्यापीठाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना लिहावा लागणार सहा तास पेपर

नागपूर : येत्या ३ जुलैपासून बीएससी नर्सिंगच्या (BSC Nursing ) चौथ्या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र तिसऱ्या सत्रात एटीकेटीधारक (ATKT) विद्यार्थ्यांसाठी चौथ्या सत्राचे पेपर देणे महागात पडणार आहे. आरोग्य विद्यापीठाने (Maharashtra University of Health Sciences) बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना एकाच दिवशी सलग सहा तास पेपर लिहावा लागणार असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला असून पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने बीएससी विद्यार्थ्यांच्या चौथे सत्र त्यासोबत तिसऱ्या सत्रातील एटीकेटी परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. यामध्ये एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन पेपर द्यावे लागणार आहेत. आरोग्य विभागाच्या या वेळापत्रक नियोजनाबाबत राज्यातील चार शासकीय तसेच दिडशेवर खासगी बीएससी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये चर्चा केली जात आहे.



असे असेल परीक्षेचे नियोजन


१० आणि १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता पेपर आहे. पेपर सुरू होण्याच्या एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर या अशी सूचना आहे. यामुळे ९ वाजता केंद्रावर यावे लागेल. सकाळी १० वाजता सुरू झालेला पेपर १ वाजता सुटेल. त्यानंतर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना लगेचच दुपारी २ ते ५ या वेळेत असणारा दुसरा पेपर सोडविण्यासाठी जावे लागणार आहे.


दरम्यान, विद्यार्थी पंधरा ते वीस मिनिटांत कुठे पाणी पिणार, कुठे जेवण करणार, विद्यार्थी उपाशीपोटी पुन्हा पेपर लिहिण्यासाठी केंद्रावर जाणार. त्यादरम्यान विद्यार्थी भोवळ येऊन पडल्यास किंवा त्याच्यावर जिवावर बेतणारा प्रसंग आल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

Comments
Add Comment

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर