BSC Nursing Exam : आरोग्य विद्यापीठाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना लिहावा लागणार सहा तास पेपर

  50

नागपूर : येत्या ३ जुलैपासून बीएससी नर्सिंगच्या (BSC Nursing ) चौथ्या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र तिसऱ्या सत्रात एटीकेटीधारक (ATKT) विद्यार्थ्यांसाठी चौथ्या सत्राचे पेपर देणे महागात पडणार आहे. आरोग्य विद्यापीठाने (Maharashtra University of Health Sciences) बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना एकाच दिवशी सलग सहा तास पेपर लिहावा लागणार असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला असून पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने बीएससी विद्यार्थ्यांच्या चौथे सत्र त्यासोबत तिसऱ्या सत्रातील एटीकेटी परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. यामध्ये एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन पेपर द्यावे लागणार आहेत. आरोग्य विभागाच्या या वेळापत्रक नियोजनाबाबत राज्यातील चार शासकीय तसेच दिडशेवर खासगी बीएससी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये चर्चा केली जात आहे.



असे असेल परीक्षेचे नियोजन


१० आणि १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता पेपर आहे. पेपर सुरू होण्याच्या एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर या अशी सूचना आहे. यामुळे ९ वाजता केंद्रावर यावे लागेल. सकाळी १० वाजता सुरू झालेला पेपर १ वाजता सुटेल. त्यानंतर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना लगेचच दुपारी २ ते ५ या वेळेत असणारा दुसरा पेपर सोडविण्यासाठी जावे लागणार आहे.


दरम्यान, विद्यार्थी पंधरा ते वीस मिनिटांत कुठे पाणी पिणार, कुठे जेवण करणार, विद्यार्थी उपाशीपोटी पुन्हा पेपर लिहिण्यासाठी केंद्रावर जाणार. त्यादरम्यान विद्यार्थी भोवळ येऊन पडल्यास किंवा त्याच्यावर जिवावर बेतणारा प्रसंग आल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat : कोल्हापूरकरांनो तुमच्यासाठी खुशखबर! कोल्हापूर-मुंबई दरम्यान १५ दिवसांत वंदे भारत ट्रेन धावणार!

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय

Solapur News : थेट पोटावर वार! वेटरला शिवीगाळ केली अन्...

सोलापूर : पत्रा तालिम येथील संदीप लक्ष्मण पाटील उर्फ भैय्या पाटील याच्यावर त्याच्याच ओळखीच्या तरूणाने आज सकाळी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो नीट वाचा...‘लाडकी बहीण योजना’मध्ये फसवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

तुमचं ही नाव आहे का? मुंबई : महायुती सरकारने सुरू केलीली ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना खूपच लोकप्रिय

जागतिक मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा जगात दुसरा क्रमांक !

देशाच्या वाढीव मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान मुंबई : भारतातील अन्न उत्पादनातील एक

शाळांच्या वेळापत्रकात बदल; आता शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता

पुणे : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळा येत्या १६ जूनपासून सुरू

लाडकी बहिण योजना कायम राहणार, अजित पवार यांचे प्रतिपादन

पुणे : ‘जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द