द.आफ्रिकेसमोर श्रीलंकेने टेकले गुडघे, ६ विकेटनी आफ्रिकेचा विजय

न्यूयॉर्क: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20world cup 2024) चौथ्या सामन्यात द. आफ्रिकेने श्रीलंकेला ६ विकेटनी हरवले. ग्रुप डीमद्ये हा सामना ३ जूनला न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. सामन्यात आफ्रिकेला विजयासाठी केवळ ७८ धावा हव्या होत्या. हे आव्हान त्यांनी १७ षटकांतच पूर्ण केले.


सामन्यात टॉस जिंकत श्रीलंकेचा कर्णधार वानिंदु हसरंगाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. श्रीलंकेचा संघ सुरूवातीपासूनच विकेट गमावत होता. त्यांना १९.१ षटकांत केवळ ७७ धावा करता आल्या. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिसने सर्वाधिक १९ धावा केल्या. याशिवाय अँजेलो मॅथ्यूज आणि कामिंदू मेंडिस यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. चार फलंदाजांना खातेही खोलता आले नाही.


आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाने जबरदस्त कामगिरी केली. त्याने चार षटकांत सात धावा देत चार विकेट मिळवल्या. कॅगिसो रबाडा आणि केशव महाराज यांनाही प्रत्येकी दोन विकेट मिळवता आल्या. तर ओटनील बार्टमॅनने एक विकेट मिळवली. तर श्रीलंकेचा एक खेळाडू रनआऊट झाला.

Comments
Add Comment

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या