Kolhapur accident : कोल्हापुरात भीषण अपघात; तिघांना चिरडले, सहा गंभीर जखमी

कोल्हापूर : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण संपूर्ण देशात गाजत असतानाच आज कोल्हापूर शहरात देखील असाच एक भीषण अपघात (Kolhapur accident) झाला. या अपघातात भरधाव वेगात असलेल्या कारने येथील कायम वर्दळीचे ठिकाण असलेल्या सायबर चौकात चार-पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे या चौकात वाहतूक सुरू असताना अचानक एका भरधाव कारने राजारामपुरीकडून येताना चौकामध्येच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


सायबर चौक हा राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम कॉलेजला जोडतो आणि या चौकात मोठी गर्दी असते. या चौकात अनेक शाळा आणि सायबर कॉलेज आहेत.


या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून कार चालकाविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. गंभीर जखमी असलेल्यांवर सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना