देशभरात आजपासून महाग झाले Amul दूध, प्रति लीटर इतक्या रूपयांची वाढ

Share

मुंबई: देशभरात सोमवारपासून म्हणजेच ३ जूनपासून अमूलच्या दूध दरात २ रूपये प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत. आता अमूल गोल्डचे दर ६४ रूपये प्रती लीटरवरून वाढून ६६ रूपये प्रती लीटर झाले आहेत. तर अमूल टी स्पेशल दुधाचे दर ६२ रूपयांवर ६४ रूपये प्रती लीटर झाले आहेत.

याबाबत अमूलचे म्हणणे आहे की वाढलेले दर हे केवळ ३-४ टक्क्यांची वाढ आहे जी अन्नमहागाई पेक्षा खूप कमी आहे. फेब्रुवारी २०२३ पासून हे दर वाढलेले नव्हते. यामुळे ही वाढ गरजेची होती. अमूलचा दावा आहे की दुधाच्या उत्पादनात आणि ऑपरेशन कॉस्टमध्ये वाढ झाल्याने हे दर वाढवण्यात आले. गेल्या वर्षी अमूलच्या दूध संघाने शेतकऱ्यांच्या दरात ६-८ टक्के वाढ केली होती.

अमूलच्या पॉलिसीनुसार ग्राहकांनी दिलेल्या १ रूपयांपैकी ८० पैसे दूध उत्पादन कर्त्याला जातात. सोबतच दह्याच्या दरातही वाढ झाली आहे. यासंबंधित अमूलकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गुजरातच्या सहकाही दूध विपणन संघाने आपल्या वितरकांना नव्या किंमतीची एक यादी पाठवली आहे.

याआधी एप्रिल २०२३मध्ये अमूलने गुजरातमध्ये आपल्या दुधाच्या किंमतीत वाढ केली होती. गुजरात सहकारी दूध विपणन संघाने संपूर्ण राज्यात अमूल दूधाच्या किंमतीत दोन रूपयांची प्रति लीटर वाढ केली होती. २०२३मध्ये वाढ केल्यानंतर अमूलच्या म्हशीच्या दुधाचे दर ६८ रूपये प्रती लीटर झाले होते.

Tags: Amul milk

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

4 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

5 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

6 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago