देशभरात आजपासून महाग झाले Amul दूध, प्रति लीटर इतक्या रूपयांची वाढ

मुंबई: देशभरात सोमवारपासून म्हणजेच ३ जूनपासून अमूलच्या दूध दरात २ रूपये प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत. आता अमूल गोल्डचे दर ६४ रूपये प्रती लीटरवरून वाढून ६६ रूपये प्रती लीटर झाले आहेत. तर अमूल टी स्पेशल दुधाचे दर ६२ रूपयांवर ६४ रूपये प्रती लीटर झाले आहेत.


याबाबत अमूलचे म्हणणे आहे की वाढलेले दर हे केवळ ३-४ टक्क्यांची वाढ आहे जी अन्नमहागाई पेक्षा खूप कमी आहे. फेब्रुवारी २०२३ पासून हे दर वाढलेले नव्हते. यामुळे ही वाढ गरजेची होती. अमूलचा दावा आहे की दुधाच्या उत्पादनात आणि ऑपरेशन कॉस्टमध्ये वाढ झाल्याने हे दर वाढवण्यात आले. गेल्या वर्षी अमूलच्या दूध संघाने शेतकऱ्यांच्या दरात ६-८ टक्के वाढ केली होती.


अमूलच्या पॉलिसीनुसार ग्राहकांनी दिलेल्या १ रूपयांपैकी ८० पैसे दूध उत्पादन कर्त्याला जातात. सोबतच दह्याच्या दरातही वाढ झाली आहे. यासंबंधित अमूलकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गुजरातच्या सहकाही दूध विपणन संघाने आपल्या वितरकांना नव्या किंमतीची एक यादी पाठवली आहे.


याआधी एप्रिल २०२३मध्ये अमूलने गुजरातमध्ये आपल्या दुधाच्या किंमतीत वाढ केली होती. गुजरात सहकारी दूध विपणन संघाने संपूर्ण राज्यात अमूल दूधाच्या किंमतीत दोन रूपयांची प्रति लीटर वाढ केली होती. २०२३मध्ये वाढ केल्यानंतर अमूलच्या म्हशीच्या दुधाचे दर ६८ रूपये प्रती लीटर झाले होते.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात