देशभरात आजपासून महाग झाले Amul दूध, प्रति लीटर इतक्या रूपयांची वाढ

मुंबई: देशभरात सोमवारपासून म्हणजेच ३ जूनपासून अमूलच्या दूध दरात २ रूपये प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत. आता अमूल गोल्डचे दर ६४ रूपये प्रती लीटरवरून वाढून ६६ रूपये प्रती लीटर झाले आहेत. तर अमूल टी स्पेशल दुधाचे दर ६२ रूपयांवर ६४ रूपये प्रती लीटर झाले आहेत.


याबाबत अमूलचे म्हणणे आहे की वाढलेले दर हे केवळ ३-४ टक्क्यांची वाढ आहे जी अन्नमहागाई पेक्षा खूप कमी आहे. फेब्रुवारी २०२३ पासून हे दर वाढलेले नव्हते. यामुळे ही वाढ गरजेची होती. अमूलचा दावा आहे की दुधाच्या उत्पादनात आणि ऑपरेशन कॉस्टमध्ये वाढ झाल्याने हे दर वाढवण्यात आले. गेल्या वर्षी अमूलच्या दूध संघाने शेतकऱ्यांच्या दरात ६-८ टक्के वाढ केली होती.


अमूलच्या पॉलिसीनुसार ग्राहकांनी दिलेल्या १ रूपयांपैकी ८० पैसे दूध उत्पादन कर्त्याला जातात. सोबतच दह्याच्या दरातही वाढ झाली आहे. यासंबंधित अमूलकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गुजरातच्या सहकाही दूध विपणन संघाने आपल्या वितरकांना नव्या किंमतीची एक यादी पाठवली आहे.


याआधी एप्रिल २०२३मध्ये अमूलने गुजरातमध्ये आपल्या दुधाच्या किंमतीत वाढ केली होती. गुजरात सहकारी दूध विपणन संघाने संपूर्ण राज्यात अमूल दूधाच्या किंमतीत दोन रूपयांची प्रति लीटर वाढ केली होती. २०२३मध्ये वाढ केल्यानंतर अमूलच्या म्हशीच्या दुधाचे दर ६८ रूपये प्रती लीटर झाले होते.

Comments
Add Comment

राणीबागेत चला बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन पहायला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभागनिहाय अंतिम आरक्षण

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला),

Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण

प्रारुप मतदार यादीवरील हरकती, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या

महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई