Monsoon Update : मुंबईकरांची होणार उकाड्यापासून सुटका! 'या' तारखेला होणार पावसाचे आगमन

हवामान विभागाने दिला अंदाज


मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी नागरिक उकाड्याने (Heat) हैराण झाले आहेत. उष्णतेने त्रस्त असलेला प्रत्येक नागरिक पावसाची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक आनंदवार्ता मिळत आहे. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून मुंबईकरांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान अभ्यासकांनी येत्या दोन दिवसात मुंबईत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज दिला आहे.


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून भारतात दाखल झाला असून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार आहे. पावसाची प्रगती योग्य गतीने सुरू असल्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत ४ ते ५ जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ६ ते १३ जूनपर्यंत चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच १० जूनपर्यंत मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.



पुढील आठवड्यात असं असेल तापमान


हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, पुढील आठवड्यात ढगाळ आकाशासह वातावरणात धुकं राहण्याचा अंदाज दिला आहे. त्याचबरोबर, रविवार आणि सोमवारी किमान तापमान २८ अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील