Monsoon Update : मुंबईकरांची होणार उकाड्यापासून सुटका! 'या' तारखेला होणार पावसाचे आगमन

हवामान विभागाने दिला अंदाज


मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी नागरिक उकाड्याने (Heat) हैराण झाले आहेत. उष्णतेने त्रस्त असलेला प्रत्येक नागरिक पावसाची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक आनंदवार्ता मिळत आहे. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून मुंबईकरांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान अभ्यासकांनी येत्या दोन दिवसात मुंबईत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज दिला आहे.


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून भारतात दाखल झाला असून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार आहे. पावसाची प्रगती योग्य गतीने सुरू असल्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत ४ ते ५ जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ६ ते १३ जूनपर्यंत चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच १० जूनपर्यंत मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.



पुढील आठवड्यात असं असेल तापमान


हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, पुढील आठवड्यात ढगाळ आकाशासह वातावरणात धुकं राहण्याचा अंदाज दिला आहे. त्याचबरोबर, रविवार आणि सोमवारी किमान तापमान २८ अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस