Monsoon Update : मुंबईकरांची होणार उकाड्यापासून सुटका! 'या' तारखेला होणार पावसाचे आगमन

हवामान विभागाने दिला अंदाज


मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी नागरिक उकाड्याने (Heat) हैराण झाले आहेत. उष्णतेने त्रस्त असलेला प्रत्येक नागरिक पावसाची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक आनंदवार्ता मिळत आहे. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून मुंबईकरांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान अभ्यासकांनी येत्या दोन दिवसात मुंबईत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज दिला आहे.


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून भारतात दाखल झाला असून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार आहे. पावसाची प्रगती योग्य गतीने सुरू असल्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत ४ ते ५ जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ६ ते १३ जूनपर्यंत चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच १० जूनपर्यंत मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.



पुढील आठवड्यात असं असेल तापमान


हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, पुढील आठवड्यात ढगाळ आकाशासह वातावरणात धुकं राहण्याचा अंदाज दिला आहे. त्याचबरोबर, रविवार आणि सोमवारी किमान तापमान २८ अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या