Monsoon Update : मुंबईकरांची होणार उकाड्यापासून सुटका! 'या' तारखेला होणार पावसाचे आगमन

हवामान विभागाने दिला अंदाज


मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी नागरिक उकाड्याने (Heat) हैराण झाले आहेत. उष्णतेने त्रस्त असलेला प्रत्येक नागरिक पावसाची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक आनंदवार्ता मिळत आहे. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून मुंबईकरांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान अभ्यासकांनी येत्या दोन दिवसात मुंबईत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज दिला आहे.


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून भारतात दाखल झाला असून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार आहे. पावसाची प्रगती योग्य गतीने सुरू असल्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत ४ ते ५ जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ६ ते १३ जूनपर्यंत चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच १० जूनपर्यंत मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.



पुढील आठवड्यात असं असेल तापमान


हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, पुढील आठवड्यात ढगाळ आकाशासह वातावरणात धुकं राहण्याचा अंदाज दिला आहे. त्याचबरोबर, रविवार आणि सोमवारी किमान तापमान २८ अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती