Gold Smuggling : कस्टम विभागाची मोठी कारवाई! मुंबई विमानतळावर १० किलो सोनं जप्त

  62

शॅम्पू बॉटल, रबर शीटमधून सोन्याची तस्करी


मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) सातत्याने सोने तस्करीचा (Gold Smuggling) पर्दाफाश केला जात आहे. मुंबई कस्टम विभागाने (Custom Department) काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर तब्बल ७.४४ कोटी रुपयांचे सोनं जप्त (Seized gold) केले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना आणखी असे प्रकरण मुंबई विमानतळावर घडल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये कस्टम विभागाने तब्बल १० किलो सोनं जप्त केल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,कारवाईमध्ये कस्टम विभागाने ९.७६ किलो सोन्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत ६.७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोन्याची तस्करी शॅम्पू बॉटल तसेच रबर शीटमधून सुरू होती. प्रवाशाने गुदद्वारातून सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले आहे.


त्याचबरोबर कस्टम विभागाने ८८ लाख रुपयांच्या किमतीचे परदेशी चलन देखील जप्त केले आहे. याप्रकरणी चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची कसून चौकशी सुरु करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तर चौकशीमध्ये चार आरोपींसह आणखी काही गुन्हेगार जाळ्यात सापडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ