Weather Update : मान्सून लांबणीवर? हवामान विभागाकडून 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट

  265

मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असल्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. दोन दिवसापूर्वीच केरळमध्ये (Keral) मान्सूनचे आगमन झाले असून १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) येण्याचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. मात्र वाढता उन्हाचा कडाका पाहता मान्सून आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये राज्याच्या कोकण (Konkan) भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात तापमान ४६.९ अंशांवर पोहोचले असून नागरिकांना वाढत्या उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यांसह कोकणात तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले असून हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे.



'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट


मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी आकाश निरभ्र राहणार असून उष्णतेचा दाह वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर राज्याच्या वर्धा, चंद्रपूर, नागपूरसह कोकणातील रत्नागिरी आणि रायगड भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.



'या' भागात पावसाच्या सरींची शक्यता


दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील २४ तास ढगाळ वातावरणासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ