Weather Update : मान्सून लांबणीवर? हवामान विभागाकडून 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट

मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असल्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. दोन दिवसापूर्वीच केरळमध्ये (Keral) मान्सूनचे आगमन झाले असून १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) येण्याचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. मात्र वाढता उन्हाचा कडाका पाहता मान्सून आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये राज्याच्या कोकण (Konkan) भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात तापमान ४६.९ अंशांवर पोहोचले असून नागरिकांना वाढत्या उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यांसह कोकणात तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले असून हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे.



'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट


मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी आकाश निरभ्र राहणार असून उष्णतेचा दाह वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर राज्याच्या वर्धा, चंद्रपूर, नागपूरसह कोकणातील रत्नागिरी आणि रायगड भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.



'या' भागात पावसाच्या सरींची शक्यता


दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील २४ तास ढगाळ वातावरणासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना