Mumbai Megablock : मेगाब्लॉकचा फटका बसलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा 'या' तारखेला होणार!

  70

मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) सीएसएमटी (CSMT) आणि ठाणे (Thane) स्थानकातील फलाटाची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी तब्बल ६३ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) जारी केला आहे. गुरुवारी मध्य रात्रीपासून या मेगाब्लॉकला सुरुवात झाली असून यामुळे लोकल ट्रेनच्या ९००हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या कारणामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून वाहतुकीचीही (Traffic) कोंडी झाली होती. मध्य रेल्वेने घेतलेल्या या मेगाब्लॉकचा फटका प्रवाशांसह मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षांवरही (Exams)पडला आहे.


मुंबई विद्यापीठामध्ये सध्या परिक्षांचे सत्र चालू असून काल काही परीक्षा पार पडल्या. मात्र, यावेळी मेगाब्लॉकमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून आजच्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.



'या' तारखेला होणार रद्द झालेल्या परिक्षा


आज बीएमएस (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र ८ ची एक परीक्षा आणि अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ ची एक परीक्षा अशा दोन परीक्षा होणार होत्या. मात्र, मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच आता या परीक्षा १ जून ऐवजी ८ जून रोजी होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही