Nagpur News : धक्कादायक! तलावात बुडून तिघांचा मृत्यू

कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर


नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये बुडलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी निघालेली एसडीआरएफच्या (SDRF) जवानांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वेंगुर्ले बंदरातही बोल उलटून चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अशा घटना ज्वलंत असतानाच नागपुरमध्येही अशीच धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.


नागपुरमधील उमरेड तालुक्यतील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक लहान मुलगा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांना धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या वाठोडा परिसरातील तिघेजण गुरुवारी दुपारच्या सुमारास डबा पार्टी करण्यासाठी मटकाझरी तलावाजवळ गेले होते. पार्टीदरम्यान, हे तिघेही तलावात बुडाले. आज सकाळी या तिघांचे मृतदेह सापडले असता याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, डबा पार्टी जीवावर बेतल्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,