Nagpur News : धक्कादायक! तलावात बुडून तिघांचा मृत्यू

  72

कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर


नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये बुडलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी निघालेली एसडीआरएफच्या (SDRF) जवानांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वेंगुर्ले बंदरातही बोल उलटून चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अशा घटना ज्वलंत असतानाच नागपुरमध्येही अशीच धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.


नागपुरमधील उमरेड तालुक्यतील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक लहान मुलगा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांना धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या वाठोडा परिसरातील तिघेजण गुरुवारी दुपारच्या सुमारास डबा पार्टी करण्यासाठी मटकाझरी तलावाजवळ गेले होते. पार्टीदरम्यान, हे तिघेही तलावात बुडाले. आज सकाळी या तिघांचे मृतदेह सापडले असता याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, डबा पार्टी जीवावर बेतल्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक