हिंगोली : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये शिवसेना नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच सत्ताधारी आमदार जनतेला काय खरं, काय खोटं? हे सांगतील का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी बांगर यांना केला होता. आता पोलिसांनीच अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगतं अयोध्या पौळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय संतोष बांगर यांनीही याचं खंडन करत अशी कोणतीही घटना झाल्याचं फेटाळून लावलं. यामुळे आता पौळ अडचणीत सापडल्या आहेत.
अयोध्या पौळ यांच्यावर हिंगोली पोलीस स्थानकात (Hingoli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्या पौळ पाटील यांनी २७ मे रोजी फेसबुक पोस्ट करत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरापुढे गोळीबाराची घटना घडल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र हिंगोली पोलिसांच्या चौकशीमध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
अयोध्या पौळ यांनी फेसबुकवर खोटी माहिती पोस्टद्वारे प्रसारित करत जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान यापूर्वी देखील आयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोलीत अनेक वेळा गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…