Ayodhya Poul : संतोष बांगरांसंबंधीची 'ती' पोस्ट खोटी! अयोध्या पौळ यांच्यावर गुन्हा दाखल

  111

काय आहे प्रकरण?


हिंगोली : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये शिवसेना नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच सत्ताधारी आमदार जनतेला काय खरं, काय खोटं? हे सांगतील का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी बांगर यांना केला होता. आता पोलिसांनीच अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगतं अयोध्या पौळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय संतोष बांगर यांनीही याचं खंडन करत अशी कोणतीही घटना झाल्याचं फेटाळून लावलं. यामुळे आता पौळ अडचणीत सापडल्या आहेत.


अयोध्या पौळ यांच्यावर हिंगोली पोलीस स्थानकात (Hingoli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्या पौळ पाटील यांनी २७ मे रोजी फेसबुक पोस्ट करत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरापुढे गोळीबाराची घटना घडल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र हिंगोली पोलिसांच्या चौकशीमध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झालं आहे.


अयोध्या पौळ यांनी फेसबुकवर खोटी माहिती पोस्टद्वारे प्रसारित करत जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान यापूर्वी देखील आयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोलीत अनेक वेळा गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक