Ayodhya Poul : संतोष बांगरांसंबंधीची 'ती' पोस्ट खोटी! अयोध्या पौळ यांच्यावर गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण?


हिंगोली : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये शिवसेना नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच सत्ताधारी आमदार जनतेला काय खरं, काय खोटं? हे सांगतील का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी बांगर यांना केला होता. आता पोलिसांनीच अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगतं अयोध्या पौळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय संतोष बांगर यांनीही याचं खंडन करत अशी कोणतीही घटना झाल्याचं फेटाळून लावलं. यामुळे आता पौळ अडचणीत सापडल्या आहेत.


अयोध्या पौळ यांच्यावर हिंगोली पोलीस स्थानकात (Hingoli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्या पौळ पाटील यांनी २७ मे रोजी फेसबुक पोस्ट करत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरापुढे गोळीबाराची घटना घडल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र हिंगोली पोलिसांच्या चौकशीमध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झालं आहे.


अयोध्या पौळ यांनी फेसबुकवर खोटी माहिती पोस्टद्वारे प्रसारित करत जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान यापूर्वी देखील आयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोलीत अनेक वेळा गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे.

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी