Ayodhya Poul : संतोष बांगरांसंबंधीची 'ती' पोस्ट खोटी! अयोध्या पौळ यांच्यावर गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण?


हिंगोली : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये शिवसेना नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच सत्ताधारी आमदार जनतेला काय खरं, काय खोटं? हे सांगतील का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी बांगर यांना केला होता. आता पोलिसांनीच अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगतं अयोध्या पौळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय संतोष बांगर यांनीही याचं खंडन करत अशी कोणतीही घटना झाल्याचं फेटाळून लावलं. यामुळे आता पौळ अडचणीत सापडल्या आहेत.


अयोध्या पौळ यांच्यावर हिंगोली पोलीस स्थानकात (Hingoli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्या पौळ पाटील यांनी २७ मे रोजी फेसबुक पोस्ट करत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरापुढे गोळीबाराची घटना घडल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र हिंगोली पोलिसांच्या चौकशीमध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झालं आहे.


अयोध्या पौळ यांनी फेसबुकवर खोटी माहिती पोस्टद्वारे प्रसारित करत जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान यापूर्वी देखील आयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोलीत अनेक वेळा गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर