Chhota Rajan : जया शेट्टी हत्या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजनला जन्मठेप!

तब्बल २३ वर्षांनंतर लागला निकाल


मुंबई : मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांडात (Jaya Shetty murder case) कुख्यात गुंड छोटा राजन (Chhota Rajan) दोषी सिद्ध झाला आहे. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने (CBI Court) आज हा निकाल दिला. २००१ साली जया शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २३ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून छोटा राजनला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी गुंड छोटा राजनला ही शिक्षा सुनावली आहे.


या प्रकरणी गेल्याच वर्षी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पानसरे यांना दोषी सिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा छोटा राजनला भारतात आणण्यात आलं तेव्हा त्याच्या विरोधातील देशभरातील सर्व  खटले सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात त्याच्या विरोधातील एकेका खटल्यावर सुनावणी सुरु आहे. त्यापैकीच एक शेट्टी हत्या प्रकरण एक आहे आणि या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून छोटा राजनला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.



काय आहे जया शेट्टी खून प्रकरण?


जया शेट्टी या हॉटेल व्यावसायिक होत्या. मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलच्या त्या मालकीण होत्या. छोटा राजन टोळीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी टोळीकडून फोनही येत होते. जया शेट्टीने खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्यावर छोटा राजन टोळीच्या दोन सदस्यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी जया शेट्टी यांनाही पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार