६ महिन्यांपासून नताशा-हार्दिकमध्ये आलबेल नाही, लवकरच होणार घटस्फोट?

  64

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटांच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोघांनीही मौन बाळगले आहे. मात्र एकामागोमाग एक प्रकारच्या मीडिया रिपोर्ट्समधून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.


यातच आता एक आणखी रिपोर्ट आला आहे यात दावा करण्यात आला आहे की हार्दिक आणि नताशा यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून आलबेल नाही. दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला आहे. असे मानले जात आहे की हे स्टार कपल घटस्फोट घेऊ शकते.



मे २०२०मध्ये केले होते लग्न


नताशा आणि हार्दिक यांनी काही काळ डेटिंग केल्यानंतर जानेवारी २०२०मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. यानंतर लवकरच लॉकडाऊनदरम्यान या कपलने लग्न केले होते. मे २०२०मध्ये दोघांनी गुपचूप लग्न उरकले होते.

हार्दिक-पांड्याला अगस्त्य आहे मुलगा


साखरपुडा झाल्यानंतर ६ महिने आणि लग्नाच्या एक महिन्यानंतरच नताशा आणि हार्दिक एका मुलाचे आई-वडिल बनले होते. त्याचे नाव अगस्त्य आहे. लग्न आणि साखरपुडा दरम्यान नताशा प्रेग्नंट होती.
Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये