Fake Notes : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सापडल्या बनावट नोटा!

दोन महिला गजाआड; मोठं रॅकेट असण्याची शक्यता


नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) काल अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake Notes) बनवून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून त्यातील एक जण फरार आहे. नाशिकमधील हे प्रकरण चर्चेत असतानाच सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये आणखी बनावट नोटा आढळल्याने आणि या नोटा चक्क महिलांकडूनच बाजारात पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल अंबड हद्दीत २३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. त्यापाठोपाठ नाशिकरोड परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणताना दोन महिला आढळून आल्या आहेत. या महिलांनी ५०० रुपयांच्या तब्बल १० हजार बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.


दरम्यान, नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचा मोठा रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता कुठपर्यंत जाणार? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर बाजारात अशा अजून किती बनावट नोटा आहेत आणि या प्रकरणात आणखी कोण सक्रीय आरोपी आहेत. याबाबत पोलिसांकडून कडक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पुण्यातून धावणार ३३४ उन्हाळी विशेष ट्रेन

पुणे : परीक्षा संपली की वेध लागतात ते सुट्टीचे, बाहेरगावी फिरायला जायचे, त्यामुळे उन्हाळ्यात रेल्वेवर

बोगस डॉक्टरांचे रॅकेट उद्ध्वस्त करणार; विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये फोफावलेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता राज्य सरकार

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील १० हजार गावांसाठी...

अहिल्यानगर: हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती