Fake Notes : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सापडल्या बनावट नोटा!

  123

दोन महिला गजाआड; मोठं रॅकेट असण्याची शक्यता


नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) काल अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake Notes) बनवून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून त्यातील एक जण फरार आहे. नाशिकमधील हे प्रकरण चर्चेत असतानाच सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये आणखी बनावट नोटा आढळल्याने आणि या नोटा चक्क महिलांकडूनच बाजारात पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल अंबड हद्दीत २३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. त्यापाठोपाठ नाशिकरोड परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणताना दोन महिला आढळून आल्या आहेत. या महिलांनी ५०० रुपयांच्या तब्बल १० हजार बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.


दरम्यान, नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचा मोठा रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता कुठपर्यंत जाणार? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर बाजारात अशा अजून किती बनावट नोटा आहेत आणि या प्रकरणात आणखी कोण सक्रीय आरोपी आहेत. याबाबत पोलिसांकडून कडक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या