Akola Crime : धक्कादायक! ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अमानुष अत्याचार

घरी सोडण्याच्या बहाण्याने शेतात नेलं अन्...


अकोला : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. घरी परतणाऱ्या एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करुन तिच्यावर एका दुचाकीस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिला सुखरुप असून प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, अकोला पोलीस आरोपींचा शोध घेत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, ७८ वर्षीय वृद्ध महिला अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतत होती. दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर ही महिला बसमधून उतरुन गावाकडे पायी चालत होती. त्यावेळी तिघेजण दुचाकीने आले व तिला गावात सोडतो, असे सांगत शेतशिवारात घेऊन गेले. त्यानंतर या तिघांपैकी एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच अत्याचार केल्याचा गुन्हा कोणाला सांगितल्यास, ठार मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली.


या घटनेदरम्यान गावातील काही लोक रस्त्यावरून जात असताना या वृद्ध महिलेने आरडाओरड सुरू केली. वृद्ध महिलेचा आवाज कानावर पडताच त्या व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. गावातील व्यक्तींनी या महिलेची सुटका केली असून तिला सुखरुपरित्या घरी सोडलं. मात्र त्यावेळी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळावरुन पळ काढला.


दरम्यान, याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार