Akola Crime : धक्कादायक! ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अमानुष अत्याचार

  101

घरी सोडण्याच्या बहाण्याने शेतात नेलं अन्...


अकोला : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. घरी परतणाऱ्या एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करुन तिच्यावर एका दुचाकीस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिला सुखरुप असून प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, अकोला पोलीस आरोपींचा शोध घेत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, ७८ वर्षीय वृद्ध महिला अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतत होती. दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर ही महिला बसमधून उतरुन गावाकडे पायी चालत होती. त्यावेळी तिघेजण दुचाकीने आले व तिला गावात सोडतो, असे सांगत शेतशिवारात घेऊन गेले. त्यानंतर या तिघांपैकी एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच अत्याचार केल्याचा गुन्हा कोणाला सांगितल्यास, ठार मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली.


या घटनेदरम्यान गावातील काही लोक रस्त्यावरून जात असताना या वृद्ध महिलेने आरडाओरड सुरू केली. वृद्ध महिलेचा आवाज कानावर पडताच त्या व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. गावातील व्यक्तींनी या महिलेची सुटका केली असून तिला सुखरुपरित्या घरी सोडलं. मात्र त्यावेळी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळावरुन पळ काढला.


दरम्यान, याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या