Mizoram News : मिझोरममध्ये चक्रीवादळाचा विध्वंस अन् पावसाचा कहर!

दगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू; अनेक घरं जमीनदोस्त


मिझोरम : बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेमल चक्रीवादळ (Remal Cyclone) पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकल्यामुळे अनेक ठिकाणी चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला. त्यासोबत राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर देखील पाहायला मिळला आहे. काही ठिकाणी वीज पडून लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या शेतीचं व घराचं नुकसान झालं आहे. अशातच फक्त राज्यातच नाही तर मिझोरममध्ये (Mizoram) देखील आता वादळी पावसाचं थैमान दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळामुळे मिझोरमची राजधानी आयझॉल येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी सहाच्या सुमारास आयझॉलच्या मेल्थम सीमेवर दगडाची खाण कोसळली (Stone Mine Collapsed). खाण कोसळल्यामुळे दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळत आहे.



पावसामुळे बचावकार्यात अडथळा


मिझोरम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, मात्र अनेक जण अजूनही अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत असला तरीही बचावकार्य सतत सुरु राहील, असे डीजीपी अनिल शुक्ला यांनी सांगितले.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू