मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result) जाहीर करण्यात आला. बारावीनंतर अनेक विद्यार्थी मिळेल त्या नोकरीच्या शोधात असतात. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये मेगाभरती (Mahavitaran Recruitment) सुरु करण्यात आली आहे. यामध्ये शंभर दोनशे नव्हे तर चक्क ५ हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकच्या एकूण ५ हजार ३४७ जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे आयटीआयचे सर्टिफिकेट असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांदरम्यान असावे.
विद्युत सहाय्यक पदासाठी अनुसूचित जाती संवर्गातून ६७३,अनुसूचित जमाती ४९१, विमुक्त जाती (अ) १५०, भटक्या जाती (ब) १४५, भटक्या जाती (क) १९६, भटक्या जाती (ड) १०८, विशेष मागास प्रवर्ग १०८, इतर मागास प्रवर्ग ८९५, ईडब्ल्यूएस ५०० तर खुल्या गटातील २ हजार ८१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून यासाठी २५० रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क घेतले जाणार आहे. तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल आणि अनाथ घटकांतील उमेदवारांना दिलेल्या सवलतीनुसार १२५ रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. २०जून २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना महावितरणची अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/ वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज भरा. तसेच त्यात काही त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घ्या. अन्यथा अर्ज बाद करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
महावितरण कंपनीकडून पात्र उमेदवारांना विद्युत सहाय्यक प्रथम वर्षासाठी १५ हजार, द्वितीय वर्षासाठी १६ हजार तर तृतीय वर्षासाठी १७ हजार इतके मानधन दिले जाणार आहे.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…