Vikas Thakre : राऊतांना नागपूरबद्दल कवडीची माहिती नाही; उगाच वायफळ बडबड करु नये!

संजय राऊतांच्या नव्या दाव्यावर काँग्रेसच्या नेत्याचीच आगपाखड


नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या भाजप नेत्यांवर आरोप करत एक नवा दावा केला. या नेत्यांनी नागपुरात नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवाचा कट रचला होता, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपकडून तर टीकेची झोड उठलीच पण काँग्रेसनेही (Congress) राऊतांना खडसावलं आहे. नागपुरात गडकरींच्या विरोधात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस नेते विकास ठाकरे (Vikas Thakre) राऊतांच्या वक्तव्यामुळे पेटून उठले आहेत. 'म्हणजे तुमचा गडकरींना पाठिंबा होता का?' असा सवाल उपस्थित करत त्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे.


विकास ठाकरे म्हणाले की, मी कुणाचीही रसद घेण्याइतपत भिकार XX नाही. ९ व्यांदा निवडणूक लढतोय. तुम्हाला भाजपात भांडणं लावायचा धंदा दिलाय का? तुमचं नेमकं काम काय आहे? महाविकास आघाडीतला एक पक्ष अशाप्रकारे विधानं करत असेल तर काँग्रेसनं त्यांना समज द्यावी. मी वरिष्ठांना आज याविषयी पत्र लिहिणार आहे. हे लिहिण्यामागचा उद्देश काय, तुम्ही गडकरींच्या बाजूने होता का? अशा शब्दांत विकास ठाकरे यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला आहे.


पुढे ते म्हणाले की, संजय राऊत जे काही बोलतात, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, उगाच वायफळ बडबड करून प्रसिद्धीसाठी बोलू नये. गडकरींबाबत त्यांचे प्रेम काय हे निवडणुकीआधी ते बोलले होते म्हणून मी कुणालाच प्रचाराला बोलावलं नाही. त्यांना भाजपाशी काय दुखणं आहे हे त्यांनी पाहावं. परंतु महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी पाळायला हवा. अन्यथा आम्हाला राऊतांविरोधात बोलायला खूप बोलू शकतो असा इशारा त्यांनी दिला.


तसेच निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गडकरींची प्रशंसा करत होते. त्यानंतर निवडणूक झाल्यावरही त्यांची प्रशंसा, गडकरींसोबत दुसरा पक्ष काढून महाविकास आघाडी करायची होती. संजय राऊतांनी बोलण्यास तारतम्य बाळगावं. नागपूरच्या विषयात त्यांना कवडीचही माहिती नाही. नागपूरची A, B, C, D ही माहिती नाही असंही विकास ठाकरेंनी सांगत उद्धव ठाकरे गटाला फटकारलं आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

TCS Nashik Case : मी देवाचे आभार मानते, टीसीएसमध्ये सहा वर्षे काम करुनही मी जिवंत; महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

नाशिक : नाशिकच्या टीसीएस या कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण ( Conversion and sexual abuse) या प्रकरणाची सध्या नाशिकच नव्हे

Ashok Kharat : भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर, फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, नशेत... ; सीएचा अशोक खरातविरोधात धक्कादायक खुलासा

नाशिक : स्वतःला दैवी अवतार सांगणारा भोंदू अशोक खरात यांच्या गळाचा आता आणखी आवळला जाणार आहे कारण याप्रकरणाच्या

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok