Pen Crime : पेणच्या खुनाचा तीन दिवसात लावला छडा!

सहा आरोपी जेरबंद


अलिबाग : पेण पोलीस ठाणे हद्दीतील २२ मे रोजी सायंकाळी चार वाजता अंबविली फाटा नवीन साई सहारा हॉटेलपासून काही अंतरावर खड्डयात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याची नोंद पेण पोलिसात होताच तीन दिवसात या खुनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडने लावत सहा आरोपींना जेरबंद केले. याबाबत पेण पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खुनाच्या या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि भास्कर जाधव, सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर या घटनेचा समांतर तपास सुरू झाला. प्रथम मृताची ओळख पटविणे, आरोपीचा शोध घेणे हे महत्वाचे आव्हान पोलिसांसमोर होते. तपास पथके तीन दिवस तपास करीत असताना आरोपी अनुज भालचंद्र मोरे (रा. आजाद नगर मांटुगा वेस्ट मुंबई) निष्पन्न झाला. या आरोपीकडे सखोल चौकशी करता, त्याने हा गुन्हा कबुल करीत या गुन्हयातील आपल्या सहकारी साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने आरोपी मनोज विष्णू गांगुर्डे, गणेश नारायण देशमुख, कानिफनाथ सुरेश म्हात्रे, सुमीत केशव चैरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेतले.


या गुन्हयात एक महिला आरोपी असल्याचेही निष्पन्न झाल्याने पथकाने महिला अंमलदारासह जाऊन रसायनी परिसरातून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. त्यामुळे एकूण सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी करता, त्यांनी हा गुन्हा कबूल केला.



नेमकं घडलं काय?


या चौकशीत मृताचे नाव अभिषेक पूर्ण नाव व पत्ता माहित नाही. हा पनवेलच्या हॉटेल पंजाबी पॅलेट याठिकाणी कामाला होता. गुन्हयातील महिला आरोपी ही देखील तेथेच सफाईचे काम करीत होती. अभिषेक हा महिला आरोपीस त्रास देत होता, तसेच तिचे मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होता. त्यानंतर अभिषेक काम सोडून तेथून निघून गेला. १७ मे रोजी केलेल्या कामाचा पगार घेण्यासाठी अभिषेक हॉटेलवर आला असताना त्याने महिला आरोपीचा मोबाईल चोरून घेऊन गेला होता.


दरम्यान, या गुन्हयातील आरोपीही या हॉटेलमध्ये काम करणारे मॅनेजर, वेटर व स्वयंपाकी आहेत. त्यामुळे अभिषेकने तिच्यासोबत केलेला प्रकार महिला आरोपीने मॅनेजर आरोपी मनोज गांगुर्डे यांना सांगताच अभिषेकला १९ मे रोजी बोलावून घेतले. त्यानंतर महिलेस त्रास देणे, तिचा मोबाईल चोरी करणे याबाबत अभिषेककडे विचारणा करीत त्याला सर्व आरोपींनी लाथाबुक्यांनी मारल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अभिषेकचा मृतदेह हॉटेलच्या फ्रीजमध्ये कोंबून बसविले आणि नंतर एका भाडयाचा टेम्पो बोलावून मृतदेहाला ग्रीनपार्क धाब्यावर आणून ठेवला. रात्र झाल्यानंतर अभिषेकचा मृतदेह गोणीत भरून रस्त्याच्या कडेला फेकून देत सर्व आरोपी पसार झाले होते.


Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली