Mumbai Ac Local : विनातिकीट घुसखोऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वे आता चांगलाच धडा शिकवणार

  54

मुंबई : महाराष्ट्रात सध्या उकाड्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे अनेकजण एसी लोकलमधून (AC Local) प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे लोकल प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र एसी लोकलचे तिकीटाचे दर जास्त असल्यामुळे काहीजण विनातिकीट घुसखोरी करत प्रवास करताना दिसतात. या गोष्टीमुळे इतर प्रवाशांना गर्दीचा तसेच अन्य काही अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून (Central Railway) मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.


मध्य रेल्वेवर दररोज ६६ एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. ज्यात जवळपास ७८ हजार ३२३ प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र या एसीमधून अनेकजण विनातिकीट प्रवास करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी मध्य रेल्वेने एक निर्णय घेतला आहे. तिकीट काढून एसी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सेंट्रल रेल्वेने एका स्पेशल मॉनेटरिंग टीमची स्थापना केली आहे. तर आता घुसखोऱ्यांविषयी तक्रार करण्यासाठी विशेष सेवा उपलब्ध करुन दिली आहे.



तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी


मध्य रेल्वेच्या टास्क फोर्सने एक व्हॉट्सअ‍ॅपवर हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर मेसेज करुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तक्रार करता येणार आहे. ७२०८८१९९८७ या क्रमांकावर मेसेज करुन प्रवासी विनातिकीट प्रवाशांची, अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास तक्रार करू शकणार आहेत. प्रवाशांना या क्रमांकावर केवळ मेसेज करुन तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर स्पेशल मॉनेटरिंग टीम साध्या वेशात येऊन कारवाई करेल. तातडीने तक्रारीचे निवारण न झाल्यास दुसऱ्या दिवशी टीम येऊन कारवाई करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून