Mumbai Ac Local : विनातिकीट घुसखोऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वे आता चांगलाच धडा शिकवणार

मुंबई : महाराष्ट्रात सध्या उकाड्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे अनेकजण एसी लोकलमधून (AC Local) प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे लोकल प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र एसी लोकलचे तिकीटाचे दर जास्त असल्यामुळे काहीजण विनातिकीट घुसखोरी करत प्रवास करताना दिसतात. या गोष्टीमुळे इतर प्रवाशांना गर्दीचा तसेच अन्य काही अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून (Central Railway) मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.


मध्य रेल्वेवर दररोज ६६ एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. ज्यात जवळपास ७८ हजार ३२३ प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र या एसीमधून अनेकजण विनातिकीट प्रवास करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी मध्य रेल्वेने एक निर्णय घेतला आहे. तिकीट काढून एसी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सेंट्रल रेल्वेने एका स्पेशल मॉनेटरिंग टीमची स्थापना केली आहे. तर आता घुसखोऱ्यांविषयी तक्रार करण्यासाठी विशेष सेवा उपलब्ध करुन दिली आहे.



तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी


मध्य रेल्वेच्या टास्क फोर्सने एक व्हॉट्सअ‍ॅपवर हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर मेसेज करुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तक्रार करता येणार आहे. ७२०८८१९९८७ या क्रमांकावर मेसेज करुन प्रवासी विनातिकीट प्रवाशांची, अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास तक्रार करू शकणार आहेत. प्रवाशांना या क्रमांकावर केवळ मेसेज करुन तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर स्पेशल मॉनेटरिंग टीम साध्या वेशात येऊन कारवाई करेल. तातडीने तक्रारीचे निवारण न झाल्यास दुसऱ्या दिवशी टीम येऊन कारवाई करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा