Child Marriage : भले शाब्बास! वर्गमैत्रिणी आणि मित्रांनी केली १२ जणींची बालविवाहापासून सुटका

  51

प्रगती पुस्तकावर दिलेल्या नंबरवर कॉल केला आणि...


छत्रपती संभाजीनगर : बालविवाह (Child Marriage) हा कायद्याने गुन्हा आहे हे माहित असूनही अनेक ठिकाणी लहान वयातच मुलींची लग्नं लावून दिली जातात. याबाबत अजूनही काही ग्रामीण भागांत पुरेशी जनजागृती झाली नाही. पण हल्लीची मुले हुशार नक्कीच झाली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एका घटनेत मुलांनी आपल्या हुशारीचा योग्य प्रकारे वापर करत वर्गमैत्रिणींची बालविवाहापासून सुटका केली आहे. महाराष्ट्रातील एका उपक्रमामुळे आणि वर्गमित्रांच्या सजगतेमुळे १२ बालविवाह रोखण्यास मदत झाली आहे.


छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेत घडलं असं की, एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यात सर्वांचे निकाल जाहीर झाले. विद्यार्थ्यांची प्रगती नोंदवणारं प्रगती पुस्तक प्रत्येकाच्या हातात आलं. यावेळी या प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले होते. बालविवाहसारख्या प्रथा रोखण्यासाठी सरकार पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक (Child helpline number) देण्यात आले होते. याच हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून तब्बल १२ बालविवाह रोखण्यात आले.


महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलींचे बालविवाह होत होते, त्या मुलींच्या वर्गमैत्रिणींनी आणि वर्गमित्रांनीच चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून हे बालविवाह रोखले. १०९८ आणि ११२ हे चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक आहेत. या क्रमांकावर फोन केल्यास पीडित आणि घटनेची माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाते.


Comments
Add Comment

मनोज जरांगेंची २९ ऑगस्टला 'चलो मुंबई'ची हाक

मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या

Electricity Price : इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या खिशाला कात्री, महावितरणाकडून दरवाढ होणार?

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करायला सुरवात केली.

दोन लाखांच्या बनावट नोटासह तिघे जेरबंद ; राहुरी पोलिसांची कारवाई

राहुरी : राहुरी पोलिसांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री शहराच्या हद्दीत मोठी कारवाई करत दोन लाख रुपयांच्या २०० व

सायन पनवेल महामार्ग स्वच्छता मोहीम यशस्वी, 3500 हून श्रीसदस्यांचा सहभाग

नवी मुंबई : स्वच्छ मुंबई शुद्ध मुंबई या संकल्पनेतून नवी मुंबईकरांनी सायन - पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहिम

आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश नाही

पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला

Pratap Sarnaik : इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

ठाणे : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात (E-tractor agriculter sector) क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन