S. Jaishankar : मतदार यादीत नावच नाही! परराष्ट्र मंत्र्यांना आला 'हा' विचित्र अनुभव

मात्र मतदान झाल्यानंतर मिळालं खास प्रमाणपत्र; नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदान (Voting) पाच टप्प्यांत पूर्ण झाले असून आज देशभरात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात दिल्ली, हरयाणा, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेशांतील ५८ जागांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत मतदानाच्या वेळी अनेकांची मतदार यादीत नावेच नसणे, मतदान केंद्र बदललेले असणे असे अनेक प्रकार समोर आले, ज्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांना देखील आज अशाच प्रकाराला सामोरं जावं लागलं. पण शेवटी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.


एस. जयशंकर सकाळी दिल्लीतील तुघलक लेनमधील अटल आदर्श शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदानाच्या रांगेत जवळपास २० मिनिटे उभेही राहिले, पण त्यांना त्या ठिकाणी मतदानच करता आलं नाही. येथील केंदातील मतदार यादीत त्यांचं नाव आढळून आलं नाही. त्यामुळे मतदान न करताच त्यांना घरी जावं लागलं. घरी जाऊन तपास केला असता त्यांचं मतदान केंद्र वेगळं असल्याचं समोर आलं. नंतर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.





मतदान झाल्यानंतर मिळालं खास प्रमाणपत्र


मतदान पार पडल्याची एक पोस्ट एस जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नवी दिल्लीतील लोकसभा मतदारसंघ-०४ मतदान केंद्र क्रमांक-५३ येथे एस जयशंकर यांनी मतदान केलं. त्या मतदान केंद्रावर मतदान करणारे ते पहिलेच पुरुष ठरले. तशा प्रकारचे प्रमाणपत्रही नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने त्यांना देण्यात आले.

Comments
Add Comment

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात