Nagpur Accident : 'हिट अँड रन'ने पुन्हा खळबळ! पुण्यानंतर नागपुरातही भीषण अपघात

  93

मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारचालकाने तिघांना उडवलं


नागपूर : पुण्यातील (Pune) ‘हिट अँड रन’ (Hit And Run) प्रकरण ज्वलंत असताना नागपुरातही (Nagpur) अशाच पद्धतीची घटना घडली आहे. झेंडा चौकात एका भरधाव कारचालकाने तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली जात आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारू आणि गांजा यांचं सेवन केलं होतं. नशेत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवलं आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्याकडून ३२ ग्रॅम आमली पदार्थ जप्त केले. त्यात दोन विदेशी दारूच्या बॉटल्स देखील मिळाल्या आहेत.



जखमींची माहिती


एका लहान बाळासह त्याची आई व एक अन्य व्यक्ती अशा तिघांना रस्त्याने जाताना उडवण्यात आलं आहे. सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमिन शेख वसीम शेख (२३ वर्षे), लहान बाळ जोहान शेख वसीम शेख अशी त्यांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



आरोपींची कसून चौकशी


दरम्यान, सनी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. या तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मेडिकल टेस्टसाठी पाठवले आहे. या प्रकरणी सर्व आरोपींची कसून चौकशी केली जाणार असून आज या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी दिली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या