Nagpur Accident : 'हिट अँड रन'ने पुन्हा खळबळ! पुण्यानंतर नागपुरातही भीषण अपघात

मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारचालकाने तिघांना उडवलं


नागपूर : पुण्यातील (Pune) ‘हिट अँड रन’ (Hit And Run) प्रकरण ज्वलंत असताना नागपुरातही (Nagpur) अशाच पद्धतीची घटना घडली आहे. झेंडा चौकात एका भरधाव कारचालकाने तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली जात आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारू आणि गांजा यांचं सेवन केलं होतं. नशेत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवलं आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्याकडून ३२ ग्रॅम आमली पदार्थ जप्त केले. त्यात दोन विदेशी दारूच्या बॉटल्स देखील मिळाल्या आहेत.



जखमींची माहिती


एका लहान बाळासह त्याची आई व एक अन्य व्यक्ती अशा तिघांना रस्त्याने जाताना उडवण्यात आलं आहे. सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमिन शेख वसीम शेख (२३ वर्षे), लहान बाळ जोहान शेख वसीम शेख अशी त्यांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



आरोपींची कसून चौकशी


दरम्यान, सनी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. या तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मेडिकल टेस्टसाठी पाठवले आहे. या प्रकरणी सर्व आरोपींची कसून चौकशी केली जाणार असून आज या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री