Nagpur Accident : 'हिट अँड रन'ने पुन्हा खळबळ! पुण्यानंतर नागपुरातही भीषण अपघात

मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारचालकाने तिघांना उडवलं


नागपूर : पुण्यातील (Pune) ‘हिट अँड रन’ (Hit And Run) प्रकरण ज्वलंत असताना नागपुरातही (Nagpur) अशाच पद्धतीची घटना घडली आहे. झेंडा चौकात एका भरधाव कारचालकाने तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली जात आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारू आणि गांजा यांचं सेवन केलं होतं. नशेत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवलं आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्याकडून ३२ ग्रॅम आमली पदार्थ जप्त केले. त्यात दोन विदेशी दारूच्या बॉटल्स देखील मिळाल्या आहेत.



जखमींची माहिती


एका लहान बाळासह त्याची आई व एक अन्य व्यक्ती अशा तिघांना रस्त्याने जाताना उडवण्यात आलं आहे. सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमिन शेख वसीम शेख (२३ वर्षे), लहान बाळ जोहान शेख वसीम शेख अशी त्यांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



आरोपींची कसून चौकशी


दरम्यान, सनी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. या तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मेडिकल टेस्टसाठी पाठवले आहे. या प्रकरणी सर्व आरोपींची कसून चौकशी केली जाणार असून आज या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी दिली.

Comments
Add Comment

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या