Nagpur Accident : 'हिट अँड रन'ने पुन्हा खळबळ! पुण्यानंतर नागपुरातही भीषण अपघात

मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारचालकाने तिघांना उडवलं


नागपूर : पुण्यातील (Pune) ‘हिट अँड रन’ (Hit And Run) प्रकरण ज्वलंत असताना नागपुरातही (Nagpur) अशाच पद्धतीची घटना घडली आहे. झेंडा चौकात एका भरधाव कारचालकाने तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली जात आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारू आणि गांजा यांचं सेवन केलं होतं. नशेत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवलं आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्याकडून ३२ ग्रॅम आमली पदार्थ जप्त केले. त्यात दोन विदेशी दारूच्या बॉटल्स देखील मिळाल्या आहेत.



जखमींची माहिती


एका लहान बाळासह त्याची आई व एक अन्य व्यक्ती अशा तिघांना रस्त्याने जाताना उडवण्यात आलं आहे. सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमिन शेख वसीम शेख (२३ वर्षे), लहान बाळ जोहान शेख वसीम शेख अशी त्यांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



आरोपींची कसून चौकशी


दरम्यान, सनी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. या तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मेडिकल टेस्टसाठी पाठवले आहे. या प्रकरणी सर्व आरोपींची कसून चौकशी केली जाणार असून आज या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी दिली.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय

लोकसेवकाचा भ्रष्टाचार! तक्रारीची चौकशी करण्यासाठी मागितली लाच... अन् अडकला जाळ्यात

नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र