Jalgaon-Pune Air Service : जळगाव -पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट; करता येणार विमानप्रवास!

तिकीट बुकिंगला सुरुवात


जळगाव : गेल्या महिन्यात गोवा जळगाव (Jalgaon) हैदराबाद अशी विमानसेवा फ्लाय ९१ विमान कंपनीने सुरू केली. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुणे विमानसेवा सुरू करण्याबाबत जळगावकरांची मागणी होती. त्यानुसार आता जळगाव-पुणे विमानसेवा (Flight Service) देखील सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे प्रवाशांचा जळगाव -पुणे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार उड्डाण ५.० योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१ विमान कंपनीने विमानसेवा सुरू केली आहे. १८ एप्रिल पासून गोवा हैदराबादला विमानसेवा सुरू केल्यानंतर जळगाव पुणे विमानसेवा देखील सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. मागणीनुसार विमान कंपनीने पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता विमान सेवा सुरू केली आहे. ही सेवा २७ मे पासून सुरु होणार असून आठवड्यातून चार दिवस राहणार आहे.



तिकीट बुकिंगला सुरुवात


विमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबर दरम्यान गोवा जळगाव पुणे या विमानसेवेचे शेड्युल तयार केले आहे. त्यानुसार तिकीट बुकिंगला देखील सुरुवात झाली आहे. यात गोवा - जळगाव - गोवा ही सेवा दररोज तर पुणे - जळगाव - पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या