SDRF Boat : उजनी घटना ताजी असतानाच प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटली!

तीन जवानांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरु


अकोले : उजनी (Ujani) जलाशयात बोट उलटून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना ज्वलंत असतानाच अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आली आहे. प्रवरा नदीत (Pravara River) बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट (SDRF Boat) उलटली असून पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू


यात एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून तर दोघांचा शोध सुरू आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे अथक प्रयत्न सुरु असल्याचे प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी सांगितले.



नेमकं काय घडलं?


काल प्रवरा नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली होती. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही शोधमोहिम सुरू होती. शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता. एसडीआरएफच्या पथकाकडून सकाळी सहा वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात आले. याचदरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे पथकाची बोट उलटून दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुसऱ्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Pune News :पुण्यातील रस्ते केले साफ,पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. नक्की काय होणार ?

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील

Kolhapur Accident News: इनोव्हा-लॉरीची जोरदार धडक: दोघांचा जागीच मृत्यू DYSP वैष्णवी पाटील गंभीर...

कोल्हापूर : कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) म्हणून कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या खासगी

निवडणुकीच्या रणधुमाळीत बडतर्फ IAS पूजाच्या घरात घडली धक्कादायक घटना, पोलीस तपास सुरू

पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या घरात रविवारी मध्यरा‍त्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ

साताऱ्यात आनंदावर शोकाची छाया; लेकीच्या जन्मावेळीच सैनिक पित्याचा अपघाती मृत्यू

सातारा : नियतीचा खेळ कधी किती निर्दयी ठरेल, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेतून आला आहे.

CSMT स्टेशनवर विमानतळासारखी सुरक्षा; वाढत्या धमक्यांनंतर कडक निर्बंध,आता प्रवेश सहज नाही…

मुंबई : रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) मेल आणि एक्सप्रेस प्रवाशांसाठी बॅगेज तपासणी अनिवार्य

कोल्हापुरात उडाली खळबळ! दोन नवविवाहितांची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या गाव खेड्यातून हुंडाबळी, छळ, यांसारख्या स्त्रियांवरील, नवविवाहितेवरील घटनांची