SDRF Boat : उजनी घटना ताजी असतानाच प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटली!

तीन जवानांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरु


अकोले : उजनी (Ujani) जलाशयात बोट उलटून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना ज्वलंत असतानाच अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आली आहे. प्रवरा नदीत (Pravara River) बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट (SDRF Boat) उलटली असून पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू


यात एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून तर दोघांचा शोध सुरू आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे अथक प्रयत्न सुरु असल्याचे प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी सांगितले.



नेमकं काय घडलं?


काल प्रवरा नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली होती. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही शोधमोहिम सुरू होती. शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता. एसडीआरएफच्या पथकाकडून सकाळी सहा वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात आले. याचदरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे पथकाची बोट उलटून दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुसऱ्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

Navi Mumbai : कामोठे येथे सिलिंडर स्फोटानंतर घरात आग; दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने