स्क्रॅपच्या बसेस मधून मुरुडकरांचा प्रवास? एम एस आर टी सी करतेय प्रवाशांच्या जीवाशी खेळ!.

मुरुड (प्रतिनिधी संतोष रांजणकर)- मुरुड आगारातील सर्वच बसेस दहा वर्षाच्या वरील असल्याच्या धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते समीर रांजणकर यांनी दिली आहे.


मुरुड आगारात सध्या स्थितीत ३३ बसेच कार्यरत आहेत. या बसेसचे आयुर्मान संपत आलेला आहे. सर्व बसेस दहा वर्षावरील आहेत, काही बसेस १४ वर्षापर्यंतच्या आहेत. या बसेसना मुंबईमध्ये प्रवासास बंदी आहे, तरी देखील मुरुड आगारातून या बसेस मुंबईसाठी सोडल्या जातात. या बसेस वारंवार ठिकठिकाणी रस्त्यामध्ये बंद पडत असतात, काही वेळा शहरातच बंद पडतात तरी काही बसेस ना आग सुद्धा लागलेली आहे.


अशा या स्क्रॅप करण्याच्या परिस्थितीत असलेल्या बसेस मुरुड मुंबई प्रवासासाठी सोडल्या जातात. सदर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वारंवार सामाजिक कार्यकर्ते समीर रांजणकर यांनी मुरुड आगाराची संपर्क साधला तिथेच न थांबताना पेण विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला आणि मुरुड साठी नवीन बसेसची मागणी सुद्धा केली होती. दहा-बारा बसेस मुरुड साठी नवीन येणार सुद्धा होत्या, परंतु सदर आगाराला तीन नवीन बसेस मिळाल्या होत्या, त्यातील दोन बसेस अचानक अलिबाग आगाराला ट्रान्सफर केल्या त्यामुळे मुरुड साठी फक्त एकच नवीन बस उपलब्ध आहे.


मुंबईमध्ये जाण्यासाठी किती वर्षाच्या बसेस ना परवानगी आहे, या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागविली असताना रायगड विभाग नियंत्रक पेण यांनी माहिती दिली की मुंबईमध्ये आठ वर्षाच्या आतील बसेस ना परवानगी आहे. तरीसुद्धा मुरुड आगारातील दहा वर्षावरील बसेस रोजचा मुरुड मुंबई प्रवास करीत आहेत. एक तर बस १४ वर्षे पूर्ण झालेली आहे. मुरुड बोरवली प्रवासासाठी वापरली जाते. या बसेस मधून मुरुडचे प्रवासी जीव मुठीत घेऊन रोजच प्रवास करत आहेत.
सदर मुरुड आगाराची परिस्थिती खूप चिंताजनक आहे. या मुरुड आगाराची दुरावस्था झालेली आहे.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर