स्क्रॅपच्या बसेस मधून मुरुडकरांचा प्रवास? एम एस आर टी सी करतेय प्रवाशांच्या जीवाशी खेळ!.

  47

मुरुड (प्रतिनिधी संतोष रांजणकर)- मुरुड आगारातील सर्वच बसेस दहा वर्षाच्या वरील असल्याच्या धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते समीर रांजणकर यांनी दिली आहे.


मुरुड आगारात सध्या स्थितीत ३३ बसेच कार्यरत आहेत. या बसेसचे आयुर्मान संपत आलेला आहे. सर्व बसेस दहा वर्षावरील आहेत, काही बसेस १४ वर्षापर्यंतच्या आहेत. या बसेसना मुंबईमध्ये प्रवासास बंदी आहे, तरी देखील मुरुड आगारातून या बसेस मुंबईसाठी सोडल्या जातात. या बसेस वारंवार ठिकठिकाणी रस्त्यामध्ये बंद पडत असतात, काही वेळा शहरातच बंद पडतात तरी काही बसेस ना आग सुद्धा लागलेली आहे.


अशा या स्क्रॅप करण्याच्या परिस्थितीत असलेल्या बसेस मुरुड मुंबई प्रवासासाठी सोडल्या जातात. सदर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वारंवार सामाजिक कार्यकर्ते समीर रांजणकर यांनी मुरुड आगाराची संपर्क साधला तिथेच न थांबताना पेण विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला आणि मुरुड साठी नवीन बसेसची मागणी सुद्धा केली होती. दहा-बारा बसेस मुरुड साठी नवीन येणार सुद्धा होत्या, परंतु सदर आगाराला तीन नवीन बसेस मिळाल्या होत्या, त्यातील दोन बसेस अचानक अलिबाग आगाराला ट्रान्सफर केल्या त्यामुळे मुरुड साठी फक्त एकच नवीन बस उपलब्ध आहे.


मुंबईमध्ये जाण्यासाठी किती वर्षाच्या बसेस ना परवानगी आहे, या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागविली असताना रायगड विभाग नियंत्रक पेण यांनी माहिती दिली की मुंबईमध्ये आठ वर्षाच्या आतील बसेस ना परवानगी आहे. तरीसुद्धा मुरुड आगारातील दहा वर्षावरील बसेस रोजचा मुरुड मुंबई प्रवास करीत आहेत. एक तर बस १४ वर्षे पूर्ण झालेली आहे. मुरुड बोरवली प्रवासासाठी वापरली जाते. या बसेस मधून मुरुडचे प्रवासी जीव मुठीत घेऊन रोजच प्रवास करत आहेत.
सदर मुरुड आगाराची परिस्थिती खूप चिंताजनक आहे. या मुरुड आगाराची दुरावस्था झालेली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या