Government Scheme : सरकारची 'ही' भन्नाट योजना; गुंतवणूकदारांना मिळणार थेट दुप्पट रक्कम!

  74

मुंबई : गुंतवणुकीचा विचार करताच सर्वात आधी अनेकांच्या डोळ्यांसमोर फिक्स डिपॉझिट करण्याची गोष्ट येते. मात्र या फिक्स डिपॉझिटपेक्षाही चांगला नफा देणाऱ्या तसेच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत. विशेष म्हणजे या सर्व योजना भारत सरकारतर्फे चालवल्या जात असल्यामुळे तुम्ही गुंतवेलेले पैसे बुडण्याचा धोका नसतो. याच पार्श्वभूमीवर सध्या पोस्ट ऑफिसच्या एका वेगळ्या योजनेची चर्चा होत आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे थेट दुप्पट होणार आहेत. विशेषत: ही रक्कम दुप्पट करण्याची हमी सरकारने दिल्यामुळे नागरिकांना पैसे बुडण्याची भीतीदेखील वाटणार नाही.


'किसान विकास पत्र' (Kisan Vikas Patra- KVP) असे पोस्ट ऑफिसच्या नव्या योजनेचे नाव असून ही गॅरंटिड रिटर्न्स देणारी योजना आहे.



योजनेअंतर्गत असणाऱ्या अटी


या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेली रक्कम थेट दुप्पट होणार असल्याची हमी सरकारकडून दिली जाते. उदाहरणार्थ, ५ लाख रुपयांचे दहा तर १० लाख रुपयांचे २० लाख रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेच्या काही अटीदेखील आहेत. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो. किसान विकास पत्र या योजनेतून दुप्पट परतावा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला रक्कम ११५ (९ वर्षे, ७ महिने) महिन्यांसाठी ठेवावी लागेल. म्हणजेच तुमचे पैसे हे ११५ महिन्यांनी दुप्पट होतील. तर या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के रिटर्न्स दिले जातात.



खाते कोण खोलू शकतं?


या योजनेअंतर्गत कोणीही खातं खोलू शकतं. तुम्हाला जॉईंट खातंदेखील खोलता येतं. १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे असलेला मुलगादेखील किसान विकास पत्र योजनेअंतर्गत खातं खोलू शकणार आहे.



खाते खोलताना 'ही' कागदपत्रं आवश्यक


या योजनेत तुम्हाला खाते खोलायचे असेल तर आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट फोटो, केव्हीपी अॅप्लिकेशन फॉर्म आदी कागदपत्रांची तुम्हाला गरज पडेल. अनिवासी भारतीयाला या योजनेत पैसे गुंतवता येत नाहीत.



वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर?


दरम्यान, या योजनेअंतर्गत तुम्हाला वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर त्यासाठी वेगळे नियम आहेत. गुंतवणूक चालू केल्यापासून २ वर्षे ६ सहा महिन्यांनंतर तुम्ही प्रिमॅच्यूअर विदड्रॉअल करू शकता.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं