Government Scheme : सरकारची 'ही' भन्नाट योजना; गुंतवणूकदारांना मिळणार थेट दुप्पट रक्कम!

  61

मुंबई : गुंतवणुकीचा विचार करताच सर्वात आधी अनेकांच्या डोळ्यांसमोर फिक्स डिपॉझिट करण्याची गोष्ट येते. मात्र या फिक्स डिपॉझिटपेक्षाही चांगला नफा देणाऱ्या तसेच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत. विशेष म्हणजे या सर्व योजना भारत सरकारतर्फे चालवल्या जात असल्यामुळे तुम्ही गुंतवेलेले पैसे बुडण्याचा धोका नसतो. याच पार्श्वभूमीवर सध्या पोस्ट ऑफिसच्या एका वेगळ्या योजनेची चर्चा होत आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे थेट दुप्पट होणार आहेत. विशेषत: ही रक्कम दुप्पट करण्याची हमी सरकारने दिल्यामुळे नागरिकांना पैसे बुडण्याची भीतीदेखील वाटणार नाही.


'किसान विकास पत्र' (Kisan Vikas Patra- KVP) असे पोस्ट ऑफिसच्या नव्या योजनेचे नाव असून ही गॅरंटिड रिटर्न्स देणारी योजना आहे.



योजनेअंतर्गत असणाऱ्या अटी


या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेली रक्कम थेट दुप्पट होणार असल्याची हमी सरकारकडून दिली जाते. उदाहरणार्थ, ५ लाख रुपयांचे दहा तर १० लाख रुपयांचे २० लाख रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेच्या काही अटीदेखील आहेत. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो. किसान विकास पत्र या योजनेतून दुप्पट परतावा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला रक्कम ११५ (९ वर्षे, ७ महिने) महिन्यांसाठी ठेवावी लागेल. म्हणजेच तुमचे पैसे हे ११५ महिन्यांनी दुप्पट होतील. तर या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के रिटर्न्स दिले जातात.



खाते कोण खोलू शकतं?


या योजनेअंतर्गत कोणीही खातं खोलू शकतं. तुम्हाला जॉईंट खातंदेखील खोलता येतं. १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे असलेला मुलगादेखील किसान विकास पत्र योजनेअंतर्गत खातं खोलू शकणार आहे.



खाते खोलताना 'ही' कागदपत्रं आवश्यक


या योजनेत तुम्हाला खाते खोलायचे असेल तर आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट फोटो, केव्हीपी अॅप्लिकेशन फॉर्म आदी कागदपत्रांची तुम्हाला गरज पडेल. अनिवासी भारतीयाला या योजनेत पैसे गुंतवता येत नाहीत.



वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर?


दरम्यान, या योजनेअंतर्गत तुम्हाला वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर त्यासाठी वेगळे नियम आहेत. गुंतवणूक चालू केल्यापासून २ वर्षे ६ सहा महिन्यांनंतर तुम्ही प्रिमॅच्यूअर विदड्रॉअल करू शकता.

Comments
Add Comment

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी