Government Scheme : सरकारची 'ही' भन्नाट योजना; गुंतवणूकदारांना मिळणार थेट दुप्पट रक्कम!

मुंबई : गुंतवणुकीचा विचार करताच सर्वात आधी अनेकांच्या डोळ्यांसमोर फिक्स डिपॉझिट करण्याची गोष्ट येते. मात्र या फिक्स डिपॉझिटपेक्षाही चांगला नफा देणाऱ्या तसेच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत. विशेष म्हणजे या सर्व योजना भारत सरकारतर्फे चालवल्या जात असल्यामुळे तुम्ही गुंतवेलेले पैसे बुडण्याचा धोका नसतो. याच पार्श्वभूमीवर सध्या पोस्ट ऑफिसच्या एका वेगळ्या योजनेची चर्चा होत आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे थेट दुप्पट होणार आहेत. विशेषत: ही रक्कम दुप्पट करण्याची हमी सरकारने दिल्यामुळे नागरिकांना पैसे बुडण्याची भीतीदेखील वाटणार नाही.


'किसान विकास पत्र' (Kisan Vikas Patra- KVP) असे पोस्ट ऑफिसच्या नव्या योजनेचे नाव असून ही गॅरंटिड रिटर्न्स देणारी योजना आहे.



योजनेअंतर्गत असणाऱ्या अटी


या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेली रक्कम थेट दुप्पट होणार असल्याची हमी सरकारकडून दिली जाते. उदाहरणार्थ, ५ लाख रुपयांचे दहा तर १० लाख रुपयांचे २० लाख रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेच्या काही अटीदेखील आहेत. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो. किसान विकास पत्र या योजनेतून दुप्पट परतावा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला रक्कम ११५ (९ वर्षे, ७ महिने) महिन्यांसाठी ठेवावी लागेल. म्हणजेच तुमचे पैसे हे ११५ महिन्यांनी दुप्पट होतील. तर या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के रिटर्न्स दिले जातात.



खाते कोण खोलू शकतं?


या योजनेअंतर्गत कोणीही खातं खोलू शकतं. तुम्हाला जॉईंट खातंदेखील खोलता येतं. १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे असलेला मुलगादेखील किसान विकास पत्र योजनेअंतर्गत खातं खोलू शकणार आहे.



खाते खोलताना 'ही' कागदपत्रं आवश्यक


या योजनेत तुम्हाला खाते खोलायचे असेल तर आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट फोटो, केव्हीपी अॅप्लिकेशन फॉर्म आदी कागदपत्रांची तुम्हाला गरज पडेल. अनिवासी भारतीयाला या योजनेत पैसे गुंतवता येत नाहीत.



वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर?


दरम्यान, या योजनेअंतर्गत तुम्हाला वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर त्यासाठी वेगळे नियम आहेत. गुंतवणूक चालू केल्यापासून २ वर्षे ६ सहा महिन्यांनंतर तुम्ही प्रिमॅच्यूअर विदड्रॉअल करू शकता.

Comments
Add Comment

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी