Government Scheme : सरकारची 'ही' भन्नाट योजना; गुंतवणूकदारांना मिळणार थेट दुप्पट रक्कम!

मुंबई : गुंतवणुकीचा विचार करताच सर्वात आधी अनेकांच्या डोळ्यांसमोर फिक्स डिपॉझिट करण्याची गोष्ट येते. मात्र या फिक्स डिपॉझिटपेक्षाही चांगला नफा देणाऱ्या तसेच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत. विशेष म्हणजे या सर्व योजना भारत सरकारतर्फे चालवल्या जात असल्यामुळे तुम्ही गुंतवेलेले पैसे बुडण्याचा धोका नसतो. याच पार्श्वभूमीवर सध्या पोस्ट ऑफिसच्या एका वेगळ्या योजनेची चर्चा होत आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे थेट दुप्पट होणार आहेत. विशेषत: ही रक्कम दुप्पट करण्याची हमी सरकारने दिल्यामुळे नागरिकांना पैसे बुडण्याची भीतीदेखील वाटणार नाही.


'किसान विकास पत्र' (Kisan Vikas Patra- KVP) असे पोस्ट ऑफिसच्या नव्या योजनेचे नाव असून ही गॅरंटिड रिटर्न्स देणारी योजना आहे.



योजनेअंतर्गत असणाऱ्या अटी


या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेली रक्कम थेट दुप्पट होणार असल्याची हमी सरकारकडून दिली जाते. उदाहरणार्थ, ५ लाख रुपयांचे दहा तर १० लाख रुपयांचे २० लाख रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेच्या काही अटीदेखील आहेत. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो. किसान विकास पत्र या योजनेतून दुप्पट परतावा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला रक्कम ११५ (९ वर्षे, ७ महिने) महिन्यांसाठी ठेवावी लागेल. म्हणजेच तुमचे पैसे हे ११५ महिन्यांनी दुप्पट होतील. तर या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के रिटर्न्स दिले जातात.



खाते कोण खोलू शकतं?


या योजनेअंतर्गत कोणीही खातं खोलू शकतं. तुम्हाला जॉईंट खातंदेखील खोलता येतं. १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे असलेला मुलगादेखील किसान विकास पत्र योजनेअंतर्गत खातं खोलू शकणार आहे.



खाते खोलताना 'ही' कागदपत्रं आवश्यक


या योजनेत तुम्हाला खाते खोलायचे असेल तर आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट फोटो, केव्हीपी अॅप्लिकेशन फॉर्म आदी कागदपत्रांची तुम्हाला गरज पडेल. अनिवासी भारतीयाला या योजनेत पैसे गुंतवता येत नाहीत.



वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर?


दरम्यान, या योजनेअंतर्गत तुम्हाला वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर त्यासाठी वेगळे नियम आहेत. गुंतवणूक चालू केल्यापासून २ वर्षे ६ सहा महिन्यांनंतर तुम्ही प्रिमॅच्यूअर विदड्रॉअल करू शकता.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे