किरण कुलकर्णी, पलावा यांना महाराजांचा आलेला सुखद अनुभव. माझ्या आईची गजानन महाराजांवर खूप श्रद्धा आणि निष्ठा आहे आणि ती कुठलीही गोष्ट किंवा कार्य करण्याआधी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय सुरू करत नाही. हे मी बरेच दिवसांपासून बघत होते. आईने मला शेगाव येथून एक छोटी पोथी आणून दिली आणि म्हणाली की, तू कुठेही घराच्या बाहेर पडताना ही पोथी नेहमी सोबत ठेवत जा.
त्याप्रमाणे मी नेहमी बाहेर जाताना पोथी सोबत ठेवत असे. एकदा मी माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला जाण्याकरिता आम्ही सर्व गाडीने निघालो. खूप रात्र झाली होती. त्यावेळी आम्ही आमची गाडी घेऊन पुण्याला निघालो होतो. त्यावेळी गाडीत आमच्या सोबत मी महाराजांची छोटी पोथी ठेवली होती.
आम्ही एक तासात थोडे पुढे गेलो आणि अचानक आमची गाडी बंद पडली. त्यावेळी पूर्ण रस्त्यावर कोणीही नव्हते. रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी बंद झाल्यामुळे काय करावे हे कळतच नव्हते. गाडी घेऊन थोडेच दिवस झाले असल्याने आम्हीही नवीन होतो. काय करावे हे कळत नव्हते. आमच्या सोबत आमची दोन वर्षांची छोटी मुलगी देखील होती. त्यामुळे काळजीत अजूनच भर पडली. त्यावेळी अचानक माझे लक्ष पोथीकडे गेले आणि मी हात जोडून महाराजांना म्हटलं, महाराज काहीतरी करा पण आम्हाला सुरक्षित घरी पोहोचवा.
तेवढ्यात आम्हाला अचानक त्या रस्त्यावरून एक माणूस येताना दिसला. तो माणूस गाडीवर येत होता. तो आमच्याजवळ येऊन गाडीजवळ थांबला. त्या माणसाने आमची विचारपूस केली. त्याला आमची अडचण समजून गॅरेजवाल्याला फोन करून दोन माणसांना बोलावून घेतले. ती दोन माणसे आली आणि त्यांनी आमच्या गाडीचे पंचर काढून दुरुस्त करून दिली. आम्ही त्यांना धन्यवाद म्हणून तेथून निघालो. पुढे प्रवासात आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. अचानक माझ्या लक्षात आले की, रस्त्यावर कोणीही नसताना अचानक तो माणूस गाडीवरून आला काय आणि त्याने त्या दोन माणसांना बोलावून गाडी दुरुस्त करून आम्हाला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढले आणि सुरक्षित घरी पोहोचवले. अन्यथा अंधाऱ्या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर लहानशी मुलगी सोबत काय अवस्था झाली असती आमची? मग का कुणास ठाऊक मला त्यावेळी असे वाटले की, श्री महाराजांनी इथे येऊन आमची मदत केली आणि नकळत मी पोथीकडे बघून हात जोडले.
तेव्हापासून माझी महाराजांवरची श्रद्धा अजूनच दृढ झाली. मी दर गुरुवारी पोथीवाचून गुरुवारी पिठलं- भाकरी महाराजांना आवडणाऱ्या पदार्थाचा नैवेद्य करून दाखवते. माझा हा पहिला अनुभव मी कधीच विसरणार नाही.
भक्तांच्या संकटाच्या वेळी महाराज नेहमीच आपल्यासोबत असतात. ते आपली साथ कधीच सोडत नाहीत. त्यामुळे मी दरवेळी कुठेही जाताना महाराजांना सांगते की, महाराज तुम्ही माझ्यासोबत राहा. त्याने मला खूप बळ मिळते. अर्थात आईने दिलेली श्री महाराजांची पोथी माझ्याजवळ नेहमी असतेच. जेणेकरून महाराज जवळ असतात.
धारदार शस्त्राने वार करत मृतदेहाचे तुकडे केले अन्... मुजफ्फरनगर : दोन वर्षांपूर्वी दिल्लीत (Delhi Murder…
बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत नाशिकच्या तरुणाचा पराक्रम नाशिक : राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढताना…
मुंबई: कर्नाटकमध्ये(karnataka) शुक्रवारी भीषण रस्ते अपघाताची(road accident) घटना घडली आहे. राज्याच्या हावेरी जिल्ह्यात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने(indian cricket team) आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) स्थान मिळवले…
नवी दिल्ली: दिल्ली एअरपोर्ट(delhi airport) टर्मिनल १वर छत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी…
मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये २७ जूनला भारताचा सामना…