Weather Update : दक्षिण अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन; 'या' राज्यांत बरसणार पावसाच्या सरी

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : मान्सूनच्या (Monsoon) आगमनाची चातकासारखी वाट पाहत असणाऱ्यांसाठी आनंदाची माहिती मिळत आहे. नैऋत्य मौसमी पाऊस म्हणजे मान्सूनची अनुकूल वातावरणामुळे वेगाने आगेकूच सुरु आहे. दक्षिण अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन झाले असून काही राज्यांत मुसळधार पावसाच्या सरी बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. तसेच येत्या काही दिवसांत केरळमध्येही हे नैऋत्य मौसमी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता पाऊसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असून लवकरच पावसाचा आनंद घेता येईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी आज दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवचा काही भाग, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान व निकोबार बेट तसेच अंदमान समुद्राचा भाग व्यापला आहे. नैऋत्येला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या दोन दिवसात म्हणजेच २४ मे पर्यंत ते बंगाल उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार करतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.



'या' भागात रेड अलर्ट


या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळला रेड अलर्ट जारी केला असून २५ मे पर्यंत मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच तमिळनाडू, पाँडेचेरी, कराईकल भागांमध्ये २४ मे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.



'या' भागात तीव्र उष्णतेची लाट


पुढील पाच दिवस वायव्य भारतातील मैदानी भागात तीव्र उष्ण लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पश्चिम-उत्तर मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटा वाहणार आहेत. तर हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांच्या भागात तीव्र उष्णता कायम राहणार असे हवामान विभागाने सांगितले आहे.


Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना