Crime : धक्कादायक! अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थीनीने उचलले 'हे' खडतर पाऊल!

निकाल लागताच ती किचनमध्ये गेली...दरवाजा लावला...अन्...


मुंबई : काल ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल हाती लागला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून अनेक जण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र, काही विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण न मिळाल्याने व नापास झाल्यामुळे ते हताश झाले. अशातच भाईंदर येथून एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भाईंदर पूर्व येथील एका बारावीच्या विद्यार्थिनीला अपेक्षित गुण न मिळाल्याने तिने कठोर पाऊल उचललं आहे. या घटनेने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षांची ही मुलगी मालाडच्या एका खासगी महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होती. काल बारावीचा निकाल लागला तेव्हा विद्यार्थिनी थोडी निराश झाली होती. कारण विद्यार्थीनीला ९० टक्के मिळावे अशी अपेक्षा होती मात्र तिला ७८ टक्के मिळाले होते. त्यामुळे या विद्यार्थीनीने मंगळवारी दुपारी किचनमध्ये असलेल्या नायलॉनच्या रश्शीने गळफास घेत आत्महत्या केली.



नेमकं घडलं काय?


बारावीतील या विद्यार्थीनीचा स्वभाव खूप लाघवी होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला बारावीत ९० टक्के मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तिला ७८ टक्के मिळाले होते. त्यामुळे ती निराश होती. परीक्षेनंतरही ती थोडी शांतच होती. यासंबंधी तिच्या कुटुंबियांनी चर्चादेखील केली होती. त्यांनी तिला समजावले होते आणि चिंता न करण्याबद्दलही समजावले होते. मात्र निकाल लागताच घरच्यांच्या नकळत ती किचनमध्ये गेली आणि दरवाजा बंद करुन घेतला. नंतर काही वेळातच एका व्यक्तीने किचनमध्ये तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्याने आरडाओरडा करुन परिसरातील नागरिकांना गोळा केले. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला आणि इमारतीतील नागरिकांना या घटनेबद्दल कळले.


दरम्यान, या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Karnataka News : पावसात ४० वर्षांचं चंदनाचं झाड कोसळलं; ८५ वर्षीय वृद्ध लखपती!

कर्नाटक : पावसाळ्यात (Monsoon) मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि तुफान वाऱ्यांमुळे (Strong Winds) झाडं कोसळल्याच्या घटना वारंवार घडतात. अशा

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा