Pune water supply : मुंबईसह पुण्यातही पाणीटंचाईचं सावट!

  52

जाणून घ्या नेमकं कारण काय


पुणे : काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा राज्यात उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. अशातच राज्यभरातील अनेक भागातील नागरिकांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसाळा जवळ येताच महापालिकेतर्फे उड्डाणपूल बांधणे, जलवाहिनी तसेच विद्युतविषयक कामांवर जोर दिला जातो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.


अशातच पुणे शहरातही देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विविध कामे हाती घेतली असून संपूर्ण पुण्यात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच पुणेकरांना पाणी जपून वापरा असे कडक आवाहनही करण्यात आले आहे.


पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती टाकी परिसर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल. आर.) टाकी परिसर तसेच एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) टाकी परिसर व चतुःश्रृंगी टाकी परिसर तसेच लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिंग, होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीने देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.


दरम्यान, पाणी विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, 'पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) काही पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर नागरी आणि विद्युत कामांचे नियोजन केले असल्याने शुक्रवारी अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही', असे म्हटले आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या