Salary Saving : पैशांची उणीव भासतेय? सेव्हिंगचा 'हा' फॉर्म्युला वापरा

खर्चानंतरही भासणार नाही पैशांची अडचण!


मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आपल्या भविष्याची चिंता असते. देशातील प्रत्येक नागरिकाची एकच तक्रार असते, ती म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार बँक अकाउंटमध्ये जमा होतो मात्र महिनाअखेर येताच तो संपतो. पगारातील एक रुपयाही वाचत नाही आणि कुठे खर्च झाला तेदेखील समजत नाही. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे अनेकांसमोर काय खावं आणि काय वाचवावं असा मोठा प्रश्न उभा राहतो. मात्र आता नागरिकांना या गोष्टीची चिंता करावी लागणार नाही. कारण सेव्हिंगचा 'हा' फॉर्म्युला वापरल्यानंतर खर्चानंतरही पैशांची अडचण भासणार नाही. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.


सेव्हिंगचा '५०:३०:२०' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फॉर्म्युल्याचा अवलंब करुन तुम्ही आता सहज बचत करू शकणार आहात. तसेच हा फॉर्म्युला लागू करून खर्च केल्यानंतरही बचतीसाठी पैसे वाचवू शकाल.



५०:३०:२० बचतीचे सूत्र


फॉर्म्युलानुसार तुमची कमाई तीन भागात विभागण्याची गरज आहे. अन्न, निवारा, आणि शिक्षण यांसह अत्यावश्यक गरजांवर कमाईतील पहिले ५०% खर्च केले पाहिजे. म्हणजे तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुमचे मासिक भाडे किंवा गृहकर्ज सुरू असेल, तर तुमचा EMI खर्च या ५० टक्के मध्ये जोडला जाऊ शकतो.



३० टक्के पगार कुठे खर्च करावा 


उत्पन्नाच्या ३० टक्के रक्कम तुमची आवड आणि इच्छांशी संबंधित गोष्टींवर खर्च करा. ज्यामध्ये बाहेर जाऊन खाणे, चित्रपट पाहणे, गॅजेट्स, कपडे, कार, बाईक आणि वैद्यकीय खर्चांसाठी कमाईतील ३० टक्के रक्कम बाजूला ठेवा. त्यानंतर उर्वरित २० टक्के बचत केली पाहिजे आणि नंतर ती योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे जेणेकरून तिचा चांगला परतावा मिळू शकेल.



अखेरीस बचत करणेही आवश्यक


५०:३०:२० फॉर्म्युलानुसार उर्वरित २०टक्के आधी जतन केले पाहिजे आणि नंतर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजेच ५०,००० रुपये पगार असलेल्या व्यक्तीने कमाईतील १० हजार रुपये गुंतवले पाहिजेत ज्यासाठी म्युच्युअल फंडात दर महिन्याला एसआयपी आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय आहेत. या फॉर्म्युल्यानुसार ५० हजार रुपये कमावणारी व्यक्ती वार्षिक किमान १.२० लाखांची बचत करु शकतो.

Comments
Add Comment

बारामतीमध्ये ग्लोबल शुगर एआय समिटचे आयोजन

बारामती : फाइंडेबिलिटी सायन्सेसने जाहीर केले आहे की ग्लोबल शुगर एआय समिट 2026 हे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती,

Cancer Fighting Food In Ayurveda: आयुर्वेदातील कोणते पदार्थ कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकतात, जाणून घ्या

मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते.

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी

अवघ्या २ आठवड्यात मोडले सर्व मोठे रेकॉर्ड; जगभरात होते 'या' सिरीजची चर्चा..

Netflix Series : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याच्या वेबसिरीजने सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. २०२६ ची सुरूवात

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या