HSC Result 2024: आज जाहीर होणार बारावीचा निकाल, पाहा कुठे, कधी तपासू शकता निकाल

मुंबई: महाराष्ट्र बोर्डाच्या १२वीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपत आहे. आज म्हणजेच २१ मे २०२४ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या गेलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होत आहे. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता.



किती वाजता येणार निकाल?


महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होईल. याबाबत सोमवारी मंडळाने नोटीस जारी केली होती. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला डिटेल्स म्हणून तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. यानंतर तुम्ही निकाल चेक करू शकता. यावर्षी तब्बल १४ लाख परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली होती.



या वेबसाईटवरून चेक करू शकता निकाल


१२वीच्या परीक्षेचा निकाल तुम्ही अनेक वेबसाईटवरून पाहू शकता. याची लिस्ट बोर्डाने नोटीससोबत जाहीर केली आहे.


mahresult.nic.in


mahahsscboard.in


hsc.mahresults.org.in


results.digilocker.gov.in


results.targetpublications.org


hscresult.mkcl.org


results.gov.in.



या तारखेला झाल्या होत्या परीक्षा


महाराष्ट्र मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान पार पडल्या होत्या.याचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यानंतर दहावीचे निकाल जाहीर होतील.


निकाल आज जाहीर होणार आहे त्यानंतर उद्या म्हणजेच २२ मेला रिव्हॅल्यूएशनसाठी तुम्ही अर्ज करू शकता. विद्यार्थी २२ मे ते ५ जूनपर्यंत यासाठी अर्ज करू शकतात.



गेल्या वर्षी मुलींची बाजी


२०२३मध्ये बारावीच्या निकालात मुलींनी ९३.७३ टक्क्यांसह बाजी मारली होती. मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली होती. मुलांचे पास होण्याचे एकूण प्रमाण ८९.१४ टक्के होते. गेल्या वर्षी पास झालेल्यांचे एकूण प्रमाण ९१.२५ टक्के होते.

Comments
Add Comment

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे