Education News : दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार; जाणून घ्या काय आहे कारण

  64

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत अतिरिक्त गुण मिळत असलेले दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार आहेत. अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट पद्धतीने काम होत असल्याचे उघडकीस आल्यामुळे असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.


विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळांमध्ये अभ्यासातील विषयांव्यतिरिक्त विविध विषयांच्या परीक्षा आणि स्पर्धा घेतल्या जात होत्या. त्याआधारे विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जात होते. मात्र अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालं आहे. तसेच शाळेत येणाऱ्या या संस्था ३०० रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र बनवून देत आहेत. याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून चक्क ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.


दरम्यान, अतिरिक्त गुणांचा बाजार बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर आणि टक्केवारीवर याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण